Download App

विरोधकांची खैर नाही! एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडू नका, आता पंतप्रधान मोदींनी CBI ला स्पष्टच सांगितलं

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : सीबीआयला (CBI) ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित हीरक महोत्सवी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोमवारी उपस्थिती लावली. आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सीबीआयच्या सहा दशकांच्या प्रवासाबद्दल आणि पुढील आव्हानांविषयी चर्चा केली आहे. एकाही भ्रष्ट्रचाऱ्याला सोडू नका, असा त्यांनी सीबीआयला सांगितलं.

मोदींनी सीबीआयला सांगितले की, ‘तुम्हाला कुठेही थांबण्याची गरज नाही. मला माहीत आहे की तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करत आहात ते खूप शक्तिशाली लोक आहेत, ते वर्षानुवर्षे सरकार आणि व्यवस्थेचा भाग आहेत. आजही अनेक ठिकाणी ते कोणत्या ना कोणत्या राज्यात सत्तेचा भाग आहेत, मात्र तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडू नये.

पंतप्रधानांनी या कार्यक्रमात पोस्टल स्टॅम्प आणि डायमंड ज्युबिली मार्क असलेले नाणे लॉन्च केले. यासोबतच शिलाँग, पुणे आणि नागपूर येथील सीबीआय शाखा कार्यालयांच्या नवीन इमारतींचेही उद्घाटन करण्यात आले.

6 दशकात सीबीआयची व्याप्ती खूप वाढली
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सीबीआयने देशाची प्रीमियम तपास संस्था म्हणून 60 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या 6 दशकात सीबीआयने एक बहुआयामी आणि बहु-शिस्ती तपास यंत्रणा म्हणून आपली ओळख निर्माण केली, आज सीबीआयची व्याप्ती मोठी झाली आहे. सीबीआयला महानगरापासून जंगलापर्यंत धाव घ्यावी लागते.

सीबीआय म्हणजे न्यायाचा ब्रँड
सीबीआयने आपल्या कामातून लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. हे प्रकरण इतर एजन्सींकडून सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी लोक आंदोलन करतात. पंचायत स्तरावरही एखादे प्रकरण समोर आले की ते सीबीआयकडे सोपवावे, असे लोक म्हणतात. न्यायाचा ब्रँड म्हणून सीबीआयचे नाव प्रत्येकाच्या ओठावर असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

Nawab Iqbal Mehmud : अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळून काय होणार?

भ्रष्टाचार हा सामान्य गुन्हा नाही, त्याला आळा घालणे ही मोठी जबाबदारी
देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची मुख्य जबाबदारी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भ्रष्टाचार हा सामान्य गुन्हा नाही. भ्रष्टाचार गरिबांचे हक्क हिरावून घेतो आणि अनेक गुन्ह्यांना जन्म देतो. लोकशाही आणि न्यायाच्या मार्गात भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडथळा आहे. जिथे भ्रष्टाचार आहे तिथे तरुणांना योग्य संधी मिळत नाही. फक्त एक विशिष्ट इकोसिस्टम तिथे भरभराटीला येते. भ्रष्टाचार हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि येथूनच घराणेशाही आणि कुटुंबवादाला बळ मिळते

2014 पूर्वी लोकांना एका फोनवर करोडो रुपयांचे कर्ज मिळायचे
भ्रष्टाचाराने आपल्या अर्थव्यवस्थेचा म्हणजेच बँकिंग व्यवस्थेचा पाया उद्ध्वस्त केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या बँकिंग क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. आज आपण इंटरनेट बँकिंगबद्दल बोलतो, आपण UPI सह विक्रमी व्यवहारांबद्दल बोलतो, परंतु 2014 पूर्वीचा बँकिंगचा काळही आपण पाहिला आहे, जेव्हा दिल्लीतील प्रभावशाली राजकीय पक्षांशी जोडलेले लोक त्यांच्या फोनवर हजारो कोटींची कर्जे मिळवत असतं.

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची लूट
गेल्या अनेक दशकांपासून भ्रष्टाचाऱ्यांनी देशाची तिजोरी लुटण्याचा आणखी एक मार्ग काढल्याचे मोदी म्हणाले. हे लोक सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची लूट करायचे. आज जनधन, आधार, मोबाईल या त्रिमूर्तीमुळे प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा पूर्ण हक्क मिळत आहे. भारताची आर्थिक ताकद जसजशी वाढत आहे तसतसे अडथळे निर्माण करणारेही वाढत आहेत. भारताच्या सामाजिक जडणघडणीवर, आपल्या एकता आणि बंधुत्वावर, आपल्या आर्थिक हितसंबंधांवर आणि आपल्या संस्थांवर आक्रमणे वाढत आहेत.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती
आज देशात भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची कमतरता नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सीबीआयला कुठेही संकोच करण्याची, कुठेही थांबण्याची गरज नाही. म्हणूनच गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे बहुरूप समजून घेऊन त्याच्या मुळापर्यंत पोहोचले पाहिजे.

Tags

follow us