Download App

छ. संभाजीनगरमधील दंगलीला BJP अन् MIM जबाबदार; दानवेंचा आरोप

  • Written By: Last Updated:

Ambadas Danve On Chatrapati Sambhaji Nagar Riot : छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटातील तणावानंतर आता विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. शहरात काल घडलेल्या घटनेमागे भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शहरातील किराडपुरा राम मंदिर परिसरात काल मध्यरात्रीनंतर दोन गटात तुफान राडा झाला. यानंतर दगडफेक करत पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. त्यानंतर आता राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

कोर्टाने दाखविली सरकारची औकात, मुख्यमंत्री तर स्वतः गुलाम; संजय राऊतांचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ज्यात दंगली घडाव्यात अस्थिरता रहावी असे काम सरकार करत आहे. सरकारचा तोच हेतू आहे. राज्यात असेच वातावरण रहावे अशी सरकारची इच्छा असून त्यासाठी मिंधे गटाच्या टोळ्या काम करत आहेत असा आरोप राऊत यांनी केला.

गेल्या 35 दिवसांत सगळ्या मर्यादा पार झाल्यात; आव्हाडांनी थेट सुनावले

राज्यात गृह मंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. गृहमंत्री फडणवीस वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करत आहेत. यामागे काय कारणे आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे. मात्र, ही कारणे सांगता येण्यासारखी नाहीत हे ही तितकेच खरे आहेत. राज्यात असेच वातावरण रहावे अशी सरकारची इच्छा आहे आणि यासाठी मिंधे गटाच्या टोळ्या काम करत असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.

 

Tags

follow us