अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ; पृथ्वीवर धडकण्याची शक्यता, भारतावर काय परिणाम होईल ?

या भूचुंबकीय वादळामुळे नयनरम्य ऑरोरा अर्थात उत्तरध्रुवीय प्रकाशाचं दर्शन घडण्याची शक्यता आहे. सामान्यतः हे प्रकाश फक्त उत्तर ध्रुवाजवळ दिसतात.

अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ; पृथ्वीवर धडकण्याची शक्यता, भारतावर काय परिणाम होईल ?

अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ; पृथ्वीवर धडकण्याची शक्यता, भारतावर काय परिणाम होईल ?

Solar Storm :  सूर्यावरून उत्सर्जित झालेल्या शक्तिशाली सौर ज्वालामुळे एक गंभीर भूचुंबकीय वादळाचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ X7.1 श्रेणीतील असून, (दि. 1 ऑक्टोबर 2024) रोजी सूर्यावरून फूटलं आहे. यामुळे ‘कोरोनल मास इजेक्शन’ (CME) नावाची शक्ती पृथ्वीच्या दिशेने साधारण 500 किमी/सेकंद वेगाने येत आहे आणि हे वादळ पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे.

NOAA चा इशारा

अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA)ने या वादळाला G3 श्रेणी दिली आहे, जी एक तीव्र भूचुंबकीय वादळ दर्शवते. या वादळाचा परिणाम 50 अंश भूचुंबकीय अक्षांशावरील प्रदेशांवर होण्याची शक्यता आहे, जेथे वीज यंत्रणा आणि तंत्रज्ञानावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, सॅटेलाइट यंत्रणांमध्येही अडचणी येऊ शकतात. पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये असलेल्या सॅटेलाइटवर वादळाचा ताण वाढू शकतो, ज्यामुळे सॅटेलाइटची स्थिरता आणि दिशा प्रभावित होऊ शकते. जीपीएससारख्या सॅटेलाइट नेव्हिगेशन प्रणालींमध्ये देखील अचूकतेत त्रुटी येऊ शकतात. उच्च वारंवारता रेडिओ संवादातही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल पुन्हा हादरल! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून, संतप्त जमावाने पोलीस स्टेशन पेटवलं

तांत्रिक समस्यांव्यतिरिक्त, या भूचुंबकीय वादळामुळे नयनरम्य ऑरोरा अर्थात उत्तरध्रुवीय प्रकाशाचं दर्शन घडण्याची शक्यता आहे. सामान्यतः हे प्रकाश फक्त उत्तर ध्रुवाजवळ दिसतात, परंतु यावेळी ते अपेक्षेपेक्षा दक्षिणेकडेही पाहता येऊ शकतात. या वादळाचा परिणाम होण्याआधीच उद्योग आणि सामान्य लोकांनी आपली तांत्रिक प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. सौर वादळामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना घेणे गरजेचे आहे. तज्ञांनी यासंदर्भात जागरूकता पसरवण्याचा सल्ला दिला आहे.

तांत्रिक प्रणालींवर परिणाम होण्याची शक्यता

भारतीय शास्त्रज्ञ आणि अंतराळ संस्था ISRO देखील या सौर वादळावर लक्ष ठेवून आहेत. भारतीय उपग्रह ऑपरेटरांना सावधगिरीचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे भारतातही काही प्रमाणात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. सौर वादळे पृथ्वीवर तात्पुरते तांत्रिक अडथळे निर्माण करू शकतात. परंतु, पृथ्वीचा चुंबकीय क्षेत्र आणि वातावरण यामुळे आपण याच्या मोठ्या परिणामांपासून सुरक्षित आहोत. तरीदेखील, येणाऱ्या काही दिवसांत तांत्रिक प्रणालींवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे सावधगिरी बाळगणे आणि तांत्रिक उपकरणांचे संरक्षण करणं गरजेचं आहे.

Exit mobile version