Download App

Ayodhya Ram Mandir: रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवा, थेट हायकोर्टात याचिका

Image Credit: Letsupp

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक जमा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. परंतु या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेत शंकराचार्यांच्या आक्षेपांचा दाखला देत हे सनातन परंपरेच्या विरुद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा फायदा घेण्यासाठी भाजप या कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याचा आरोप केला जात आहे.

‘प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमावर शंकराचार्यांचा आक्षेप’
गाझियाबादच्या भोला दास यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शंकराचार्यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप असल्याचे जनहित याचिकामध्ये म्हटले आहे.

पौष महिन्यात कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. याशिवाय मंदिर अजूनही अपूर्ण आहे. अपूर्ण मंदिरात कोणत्याही देवता किंवा देवतेची प्राणप्रतिष्ठा करता येत नाही.

Mahua Moitra : ‘सरकारी बंगला तत्काळ सोडा, नाहीतर’.. खासदारकी गेलेल्या मोईत्रांना केंद्राची नोटीस

याशिवाय या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचा सहभाग संविधानाच्या विरोधात आहे. याचिकेत या कार्यक्रमाला केवळ निवडणूक स्टंट असल्याचे म्हटले आहे. या जनहित याचिकेवर उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी न होण्याची भूमिका चारही शंकराचार्यांनी घेतली आहे. मंदिराचे काम अपूर्ण असल्याचे त्यांनी कारण दिले आहे. यासोबत काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी देखील या सोहळ्यावर आक्षेप घेतला आहे.

‘बाबरी मशीद पाडल्यापासून ते आणीबाणी! ‘मैं अटल हूं’ चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

follow us

वेब स्टोरीज