The Kerala Story: अभिनेत्री अदा शर्मा पोहोचली महादेवाच्या दरबारी; ‘शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral

Adah Sharma: बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या तिच्या ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाविषयी देशभर मोठा वाद सुरू आहे तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर (box office) हा सिनेमा रोजच मोठी कमाई होत आहे. आज अदा शर्माचा वाढदिवस (Adah Sharma birthday) आहे.   View this post […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 11T151422.708

Adah Sharma

Adah Sharma: बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या तिच्या ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाविषयी देशभर मोठा वाद सुरू आहे तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर (box office) हा सिनेमा रोजच मोठी कमाई होत आहे. आज अदा शर्माचा वाढदिवस (Adah Sharma birthday) आहे.


दरम्यान अदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये ती शिवलिंगासमोर बसून शिवतांडवचा पाठ करत असल्याचे दिसून येत आहे. अदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. अदा शर्माने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ती शिव मंदिरातील शिवलिंगासमोर बसली असल्याचे दिसून येत आहे. ती नियमानुसार शिवतांडव पठण करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अदाने लिहिले आहे की, ‘माझ्या उर्जेचे रहस्य. ऊर्जा जी मला निर्बंधांचा सामना करण्यास अनुमती देते. मला तुमची बनवल्याबद्दल धन्यवाद.

‘द केरला स्टोरी’ या सिनेमाच्या प्रदर्शनावरून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला आहे. या सिनेमामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे देशातील अनेक राज्य सरकारांचे म्हणणे आहे. यामुळे या सिनेमावर पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये बंदी घातली गेली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरयाणात हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे.

‘द केरळ स्टोरी’ची सहाव्या दिवशीही छप्पर फाड कमाई, कमावले ‘इतके’ कोटी

तसेच दिल्लीत देखील हा सिनेमा करमुक्त करावा, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र देखील लिहिले आहे. तसेच सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या अभिनेत्री मुख्य भूमिकेमध्ये दिसून आली आहे. या सिनेमाच्या कथानकात केरळ राज्यातील मुलींची मोठी फसवणूक कशा पद्धतीने करण्यात आली होती, याचे वास्तव चित्रण दाखवण्यात आले आहे.

केरळमधील दहशतवादी कटांवर आधारित हा सिनेमा आहे. सध्या या सिनेमाची सर्वत्र चर्चा बघायला मिळत आहे. हा सिनेमा ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण ५६.७२ कोटी रुपयांची मोठी कमाई केली आहे.

Exit mobile version