Tejasswi Prakash Marriage: ‘बिग बॉस १५’ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) कायम काहींना काही कारणामुळे जोरदार चर्चेत असते. ‘बिग बॉस’च्या (Big Boss) या सीझनमध्ये तेजस्वीला तिचे प्रेम देखील मिळाले होते. अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात एकत्र दिसून आले होते. या ठिकाणी ते दोघे एकमेकांच्या चांगलंच प्रेमात पडल्याचे देखील दिसून आले होते. त्यांची प्रेमकहाणीला ‘बिग बॉस १५’च्या घरातून सुरूवात झाली आहे, जे आजही टिकून राहिले.
चाहते देखील या सुपर जोडीवर भरभरून प्रेम करत असतात. परंतु ही जोडी आता लग्न (Marriage) बंधनात कधी अडकणार, असा सवाल त्यांच्या सर्व चाहत्यांना पडला आहे. यावर आता अखेर अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिले आहे.चाहत्यांची लाडकी ‘तेजारण’ ही जोडी लग्न कधी करणार याविषयी सगळ्यांनाच मोठी उत्सुकता लागली आहे. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन दोघेही कायम एकमेकांबरोबर दिसून येत आहेत. नुकतेच दोघे एका पार्टीमध्ये एकत्र दिसून आले होते.
यावेळी देखील त्यांना लग्नाविषयी सवाल विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत असताना तेजस्वी म्हणाली आहे की, ‘आम्ही दोघही सध्या रिलेशनशिपमध्ये खूप खूश आहोत. या प्रवासाचा आनंद घेत आहोत. कायम एकत्र असल्याने आम्हाला खूप सुरक्षित असल्याचे वाटत आहे. सध्या आमच्यावर लग्नाचं कोणतंही प्रेशर नसल्याचे यावेळी तिने सांगितले आहे. आपल्या लग्नाच्या चर्चांविषयी बोलत असताना तेजस्वी पुढे म्हणाली आहे की, ‘करणला माहित आहे की, मी सध्या माझ्या करिअरच्या अंतिम टप्प्यावर आहे.
त्यामुळे लग्न तेव्हाच होईल, जेव्हा आम्ही दोघेही त्यासाठी तयार झालेले असू..आम्हाला दोघांना देखील माहित आहे की, या नात्याकडून आमच्या काय अपेक्षा आहेत. आम्ही आमच्या नात्याविषयी आश्वस्त असल्याचे आहोत. त्यामुळे सध्या काहीच प्रेशर नाही.असे यावेळी अभिनेत्रीने सांगितले आहे. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस सीझन १५’ची विजेती ठरली होती. या सीझनमध्ये तिच्याबरोबर स्पर्धक करण कुंद्रा देखील सहभागी झाला होता.बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये आधी मैत्री झाली अन् त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. आता चाहते दोघांच्या लग्नाची चांगलीच वाट पाहात आहेत. परंतु दोघेही सध्या कामात व्यस्त असल्याने इतक्या लवकर लग्नाचे प्लॅनिंग नसल्याचे म्हणत असल्याचे दिसून येत आहे.