Download App

Lagnakallo : सिनेमातील सिद्धार्थ आणि भूषणच्या सोबतच्या केमिस्ट्रीबद्दल मयुरी पहिल्यांदाच बोलली

Mayuri Deshmukh On Lagnakallo Movie: मराठी मनोरंजनविश्वात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन सिनेमाची घोषणा करण्यात येत आहे. (Marathi Movie ) ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून मयुरी देशमुखकडे (Mayuri Deshmukh) पाहिले जाते. ती कायमच विविध कारणाने चर्चेत असते. नुकतंच तिने ‘लग्नकल्लोळ’ (Lagnakallo Movie) सिनेमाच्या प्रदर्शनानिमित्त लेट्सअप मराठीने अभिनेत्री व तिच्या टीमशी खास संवाद साधला. त्यावेळी तिने या चित्रपटाबद्दल खास माहिती दिली.

यावेळी बोलताना चाहत्यांची लाडकी अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) या सिनेमातील सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि भूषण प्रधानच्या (Bhushan Pradhan) केमिस्ट्रीबद्दल सांगितली आहे. म्हणाली की, सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता सिद्धार्थ आणि भूषण यांच्यासोबत आधी एकदाही मी काम केले नव्हते. मात्र एकदा- दोनदा नाटकाच्या ठिकाणी वगरे भेट झाली असेल, परंतु पहिल्यांदा आम्ही एकत्र काम करणार होतो. माझा मुळात स्वभाव हा रिजव्ड आणि थोडा असा की आपलं आपलं काम करूया, त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस फार मिसळणं नाही झालं, पण या दोघांचे मात्र मी निरीक्षण करत होते, माझ्यापेक्षा अभिनेता सिद्धार्थ जाधवचा अभिनय क्षेत्रातला अनुभव खूप मोठा आहे. त्याचे आतापर्यंत १०० फिल्म झाले असतील.

पुढे म्हणाली की, या लोकांकडून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत. तर सुरुवात ही अशी झाली होती, आणि शूटिंग दरम्यान आमच्या पाहत एक सुंदर स्क्रिप्ट आली आहे. आणि एक सुंदर कथा आहे. त्यात प्रत्येकाच्या अभिनयाबद्दल खूप सुंदर लिहिलेले आहे. आणि प्रत्येकाची यासाठी ओढ लागली होती. ती पात्र रंगवण्याचीचं होती. मग गप्पा जरी होत असल्या तरी सीनबद्दल गप्पा होत असत. तर मैत्री किंवा बॉंड म्हणाल तर आता प्रमोशन दरम्यान जास्त झाला आहे. कारण आमच्या तिघांच्या एनर्जी खूप उत्तम आहेत. त्यामुळे सिद्धू दादाच्या एनर्जीला मॅच केलं असं काही नाही. त्याची जितकी एनर्जी आहे ती सामावून घेण्याची एनर्जी आहे. या दोघांसोबत काम करताना आता माझ्या लक्षात आलं की, ते इतकं का सुरळीत होत, आणि काही गोष्टीमध्ये आम्ही क्लेअर होतो.

Siddharth Jadhav: ‘लग्नकल्लोळ’ मधील अभिनयाबद्दल अभिनेत्याने भरभरून सांगितलं, म्हणाला…

या सिनेमात सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार, हे अद्याप गुपित स्पष्ट आहे. हे गुपित काल 1 मार्चला उलगडला आहे. चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकार आहेत. हा लग्नाचा धमाका 1 मार्चला उडणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे, आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

follow us

वेब स्टोरीज