दोन चेहरे, एक दिग्गज: ‘आखरी सवाल’ आणि ‘खलनायक रिटर्न्स’मधून संजय दत्तचा नवा अवतार

Sanjay Dutt : संजय दत्त अभिनित ‘आखरी सवाल’ हा चित्रपट सध्या सर्वाधिक उत्सुकता निर्माण करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. नुकत्याच प्रदर्शित

Sanjay Dutt

Sanjay Dutt

Sanjay Dutt : संजय दत्त अभिनित ‘आखरी सवाल’ हा चित्रपट सध्या सर्वाधिक उत्सुकता निर्माण करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने या चित्रपटाबाबतची चर्चा आणखी वाढवली आहे. प्रभावी आणि विचार करायला भाग पाडणारी झलक देणारा हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित असल्याचे दिसते आणि अनेक वादग्रस्त व चर्चेत राहिलेल्या विषयांना हात घालतो. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी संजय दत्तचा व्यक्तिरेखा आहे. तीव्र, अधिकारवाणी असलेली आणि सत्तेला प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवणारी. ज्यामुळे तो एका गुंतागुंतीच्या जगात उत्तरांच्या शोधात असलेला माणूस म्हणून उभा राहतो. त्याचा लूक आणि त्याच्या अभिनयातील शांत आत्मविश्वास आधीच चर्चेचा विषय बनला आहे.

मात्र, चर्चा इथेच थांबत नाही. त्याच्या आणखी एका आगामी चित्रपट ‘खलनायक रिटर्न्स’मधील त्याचा लूकही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात तो खडबडीत, रॉ आणि जवळपास आक्रमक अवतारात दिसतो, जो त्याच्या आयकॉनिक मास अपीलला पुन्हा उजाळा देतो. जिथे ‘आखरी सवाल’ संयम आणि अंतर्गत संघर्षावर आधारित आहे, तिथे ‘खलनायक रिटर्न्स’ ऊर्जा आणि दमदार उपस्थितीवर आधारित आहे. या दोन्ही चित्रपटांमधून संजय दत्तच्या केवळ वेगवेगळ्या लुक्सचाच नव्हे तर त्याच्या अभिनयातील खोलीचाही प्रत्यय येतो. तो अत्यंत सहजतेने पूर्णपणे भिन्न व्यक्तिरेखांमध्ये स्वतःला साकारतो, ज्यामुळे त्याची अभिनेता म्हणून असलेली बहुआयामी क्षमता अधिक ठळकपणे समोर येते.

आखरी सवाल’ भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकतो, ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदी, बाबरी मशीद पाडणे आणि महात्मा गांधींची हत्या यांचा समावेश आहे. वेगळ्या दृष्टिकोनातून मांडणी करत हा चित्रपट जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एकाच्या प्रवासाचा मागोवा घेतो आणि प्रस्थापित कथनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. संवेदनशील ऐतिहासिक घटनांकडे धाडसी दृष्टीकोनातून पाहणारा हा चित्रपट आपल्या टीझर आणि पोस्टर्समुळे आधीच चर्चेत आहे आणि प्रेक्षकांना इतिहासातील कमी उलगडलेल्या अध्यायाकडे आकर्षित करण्याचे आश्वासन देतो.

मंसूर खान आणि आमिरची जोडी पुन्हा एकत्र! ‘या’ दिवशी होणार ‘एक दिन’चा ग्रँड प्रीमियर-

‘आखरी सवाल’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वरंग यांनी केले आहे. निक्खिल नंदा प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निक्खिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली असून सहनिर्माते पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद आहेत. कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैठाणी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट 8 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version