Swayambhu : अलीकडेच सेंगोल चर्चेत आला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात तो धारण करून संसदेत स्थापित केला. दरम्यान, ‘स्वयंभू’चा टीझर 11 फेब्रुवारी रोजी दोन शहरांमध्ये एकाच वेळी होणाऱ्या पॅन-इंडिया इव्हेंटमध्ये लॉन्च केला जाणार आहे. आगामी चित्रपट स्वयंभूमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या निखिल सिद्धार्थने चित्रपटाच्या कथेच्या मुळांबद्दल भाष्य केलं आहे. त्याने सांगितलं की हा चित्रपट भारतीय इतिहास आणि संस्कृतीशी घट्ट जोडलेला असून, त्याची प्रेरणा थेट सेंगोलच्या इतिहासातून घेतली आहे. सेंगोल हा योग्य शासन, न्याय आणि नैतिक बळाचं प्रतीक मानला जातो आणि हाच विचार चित्रपटाच्या कथेला पुढे नेतो.
चित्रपटाच्या मूळ संकल्पनेबद्दल बोलताना निखिल म्हणाला, “स्वयंभूची कथा भारतीय इतिहासातील एका अतिशय खास आणि युनिक पैलूपासून उगम पावते तो म्हणजे सेंगोलचा इतिहास. आज आपल्यापैकी बहुतांश लोक सेंगोलला त्या प्रतीकाच्या रूपात ओळखतात, जो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद उद्घाटनावेळी धारण केला आणि जो नव्या संसद भवनात स्थापित आहे. पण त्यामागचा समृद्ध इतिहास फार कमी लोकांना माहीत आहे. सेंगोल सर्वप्रथम भगवान रामांनी आपल्या वंशजाला दिला होता. तो धर्मपूर्ण शासन, न्याय आणि योग्य पद्धतीने राज्य करण्याच्या शक्तीचं प्रतीक आहे. हा सेंगोल पुढे भारताच्या इतिहासातून प्रवास करत राहिला आणि चोल साम्राज्यासारख्या महान भारतीय साम्राज्यांमध्ये त्याला विशेष महत्त्व होतं. सेंगोल आणि आमच्या नायकाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही एक फिक्शनल कथा रचली आहे.”
नव्या संसद भवनात स्थापनेनंतर सेंगोल पुन्हा एकदा चर्चेत आला असला, तरी त्याचा इतिहास शतकानुशतके जुना आणि अनेक थरांचा आहे. स्वयंभू या प्रतीकाला भव्य सिनेमॅटिक कॅनव्हासवर सादर करत पौराणिक कथा, इतिहास आणि कल्पनारंजन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे प्रेक्षकांना एक भव्य आणि प्रभावी कथानुभव मिळेल. उत्साह आणखी वाढवत, निर्मात्यांनी जाहीर केलं आहे की स्वयंभूचा टीझर 11 फेब्रुवारी रोजी दोन शहरांमध्ये एकाच वेळी होणाऱ्या ग्रँड पॅन-इंडिया इव्हेंटमध्ये लॉन्च केला जाईल.
झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित! कौटुंबिक महासोहळा रंगणार 3 एप्रिलला-
हा ड्युअल-सिटी लॉन्च चित्रपटाचा मोठा स्केल आणि उंचावलेली दृष्टी अधोरेखित करतो, जो देशभरातील प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आला आहे. स्वयंभूची निर्मिती पिक्सेल स्टुडिओजचे भुवन आणि श्रीकर यांनी केली आहे. भारताच्या समृद्ध इतिहासाला आणि कालातीत गौरवाला समर्पित असलेला हा भव्य चित्रपट महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, 13 फेब्रुवारी 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
