दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले
2 / 7
मराठवाड्यात गारांचापाऊस झाला. शेतीमध्ये गारांचा ढीग पाहायला मिळाला.
3 / 7
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले.
4 / 7
अवकाळी पावसाचा फटका सर्वाधिक नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याला बसला, या दोनच जिल्ह्यातील जवळपास 30 ते 35 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
5 / 7
मागील महिन्यात अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानाची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही, त्यात आता हे दुसरं संकट शेतकऱ्यांवर आलं आहे. शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत.
6 / 7
या पाऊसाचा सर्वाधिक फटका गहू, बाजरी, कांदा, द्राक्ष, आंबा या पिकांना बसला, राजभरातील 1 लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे.
7 / 7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यात नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली.