Terrorism and dialogue not together; Shahbaz Sharif expresses desire for talks, India gives a befitting reply : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील (Pakistan) 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारले आहे. त्याचबरोबर भारताने पाकशी असलेले द्विपक्षीय संबंध कमी केले आहेत. ज्यामध्ये सिंधू करार स्थगित करण्यात आला. त्याचबरोबर व्यापार देखील बंद केला गेला. त्यानंतर अगोदरच अर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानने गुढघे टेकवत भारताशी चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. पाकने आतापर्यंत दोनदा असा पुढाकार घेतला आहे. मात्र भारताने त्यावर दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही. असं म्हणत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे.
भारताची भूमिका काय?
पाकिस्तानशी आपले द्विपक्षीय संबंध आणि संवाद अगदी स्पष्ट आहेत. आपली भूमिका देखील त्याबाबतीत स्पष्ट आहे. आम्ही पहिल्या पासून हा संवाद थेट द्विपक्षीय ठेवण्यात रस दाखवला आहे. पण पाकिस्तानकडून जरी चर्चेचा प्रस्ताव किंवा इच्छा व्यक्त केली जात असली तरी देखील भारताची भूमिका आहे की, दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही. तसेच जर पाकिस्तानला दहशदवादावर भारताशी चर्चा करायची असेल तर त्यांनी यावर अगोदर विचार करावा जी दहशतवाद्यांची यादी भारताने त्यांना दिली आहे. ती आम्हाला सुपुर्द करावी. तर जम्मू-काश्मीरबाबत बोलायचं असेल तर काश्मीरचा जो भाग पाकिस्तानने अवैधरित्या ताब्यात घेतला आहे. त्यावरच द्विपक्षीय संवाद साधला जाईल. की, पाकिस्तान केव्हा ते पीओके सोडतील?
अखेर ससूनच्या डॉ. अजय तावरेला बेड्या; बनावट कुटुंब दाखवून चालवायचे किडनी रॅकेट
दरम्यान या अगोदर देखील पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी (Operation Sindoor) पंजाब प्रांताचा दौरा केला. यादरम्यान, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षात सहभागी असलेल्या अधिकारी आणि सैनिकांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलंय की, आम्ही शांततेसाठी भारताशी चर्चा करण्यास तयार आहोत. शरीफ यांच्यासोबत उपपंतप्रधान इशाक दार, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर होते.
Dhananjay Munde : सगळ्या त्रासापासून वाचण्यासाठी धनंजय मुंडे नक्की गेलेत कुठे?
यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान भारतासोबत चर्चा आणि शांततेच्या अटींमध्ये काश्मीर मुद्द्याचा समावेश करण्याबद्दल बोलले आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी गुरुवारी (15 मे) सांगितलं की, ते भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शाहबाज शरीफ यांचे हे विधान दोन्ही देशांमधील लष्करी कारवाया थांबवण्यासाठी 10 मे 2025 रोजी झालेल्या युद्धबंदी करारावर आहे.