CM Devendra Fadnavis in Chowdi Ahilya Devi Trishatabdi Janmotsav : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Janmotsav) यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा चौंडीमध्ये (Chowdi) आज संपन्न झालाय. अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठीसाठी आज बडे नेते चौंडीमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. लवकरच राष्ट्रपती, पंतप्रधान चौंडीत येतील, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) यावेळी बोलताना केलं.
अहिल्यादेवींनी 28 वर्ष राज्यकारभार चालवला. चौंडी हे प्रेरणास्थान आणि ऊर्जास्थान आहे. भारताची ताकद इथल्या मंदिरात, अध्यात्मात असल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय. अहिल्यादेवींचं दर्शन घेण्याकरिता पंतप्रधान मोदी लवकरच चौंडीत (Ahilyanagar) येतील, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तर मध्य प्रदेशात देखील अहिल्यादेवींच्या जयंतीचं भव्य आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा…, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटणार?
पतीच्या निधनानंतर अहिल्यामाता डळमळल्या नाहीत. कारण संपूर्ण राज्य माझा परिवार आहे, माझी जबाबदारी आहे. देशाच्या राजकारणात कल्याणकारी राजांसोबत पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचं नावं घेतलं जातंय. हिंदू धर्म जागृत ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. अहिल्यादेवी होळकरांनी हुंड्याची प्रथा बंद केली. अहिल्यादेवींच्या जीवनावर चित्रपट काढणार असल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय.
‘सैयारा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! इंटरनेटवर मिळतोय जबरदस्त प्रतिसाद
तलावांच्या संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. आदिशक्ती अभियान देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला. सिनेमा असं माध्यम आहे ज्यातून इतिहास पोहोचवू शकतो. त्यामुळे अहिल्यादेवींच्या जीवनावर आपण बहुभाषित चित्रपट तयार करणार आहोत. जेणेकरून तो सर्व भाषेत पोहोचवू शकतो. ज्याप्रमाणे अहिल्यादेवींनी वंचितांकरिता सरकार चालवलं. त्याचप्रमाणे आम्ही देखील महायुती सरकार वंचितांसाठी चालवू. त्यासाठी जीवनाचा एक-एक क्षण घालवू. ही प्रतिज्ञा आज अहिल्यादेवी यांच्यासमोर आम्ही सगळे करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.