Ashish Shelar Said Comprehensive Plan For Conservation : राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील 500 मंदिरे, 60 राज्य संरक्षित किल्ले आणि 1800 बारवा (जलस्रोत) यांच्या संवर्धनासाठी बृहद् आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. त्या बृहत् आराखडामध्ये त्याचं जतन, संवर्धन आणि यापुढे पर्यटक, फुटफॉल वाढवणे याचा समावेश असेल मैत्रीच्या सोबतीने पुरातत्व विभाग ज्या मध्ये नोडल एजन्सी म्हणून काम करेल, अशा पद्धतीचा निर्णय आज घेण्यात आला. शिवाय पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक तीन जिल्ह्यांतील ऐतहासिक स्थळे, मंदिरे, गडकिल्ले यांचा स्वतंत्र एकात्मिक बृहत् आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील मंदिरे, किल्ले आणि ऐतिहासिक वस्तू संवर्धनाविषयी मंत्रालयात आज मंत्री ॲड आशिष शेलार यांनी (Ashish Shelar) घेतली. बैठकीला मैत्रीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्वचे संचालक तेजस गर्गे, पु. ल. देशपांडे (Comprehensive Plan For Conservation) कला अकदामीच्या संचालिका मिनल जोगळेकर, सांस्कृती (Forts) संचालक विभिषण चवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राला समृद्ध वारसा
आपला महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचा इतिहास, ऐतिहासिक मूल्य असलेल्या वास्तू, मंदिरं, गड-किल्ले, बारव हा आपला अभिमान आहे. त्यामुळे जतन संवर्धनाबाबत योग्य नियोजनासाठी बृहत् आराखडयाची आवश्यकता असून कालमर्यादेत पूर्ण करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने ही बैठक आज घेण्यात आली. त्यामुळे या आराखड्यात राज्य संरक्षित वारसा स्थळांबरोबरच राज्य संरक्षित नसलेल्या ३५० किल्ल्यांचा देखील समावेश करण्यात यावा. आराखड्यानंतर प्रत्यक्ष संवर्धनाच्या कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, तसेच खासगी भागीदारी (Public-Private Partnership) विचारात घ्यावी. गरज असल्यास खासगी भागीदारीसाठी स्वतंत्र धोरणही तयार करण्यात यावे, अशा सूचना मंत्री शेलार यांनी यावेळी केल्या.
आराखडा तयार करताना इतिहास, वास्तुशास्त्र, पुरातत्त्व, संवर्धन आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील तज्ञांची नेमणूक करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुसंगत आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पीआययू – PIU) यामध्ये चार नवीन अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती जाहिरात करून करणं, 15 डिसेंबरच्या अगोदर या पद्धतीच्या समितीच्या स्थापन करण्याचा निर्णयसुद्धा आज घेण्यात आला आहे.
तीन जिल्ह्यांचे डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनेशन
पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तू संवर्धन आणि सांस्कृतिक प्रसिद्धी साठी डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनेशन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून या जिल्ह्यांतील ऐतहासिक स्थळे, मंदिरे, गडकिल्ले यांचा एकात्मिक बृहत् आराखडा स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये या वास्तूंचे जतन, संवर्धन, देखभाल आणि पर्यटन वाढविणे याचा समावेश असेल. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपूर्णतः चर्चा करून पुरातत्व विभाग नोडल एजन्सी आणि मित्राच्या मदतीने या विषयाचा एकात्मिक बृहत् आराखडा बनवण्याचे नियोजनाचे निर्देश मंत्री ॲड शेलार यांनी आज दिले.
रोड मॅप
पुढच्या दोन वर्षांमध्ये हे दोन्ही आराखडे एकदा तयार झाल्यानंतर अस्तित्वात असलेले जे आपले पीपीपी धोरण आहे, सरकारी निधी आहे आणि आवश्यकता असेल तर वर्ल्ड बँक आणि एडीबीच्या निधीतून निधी उभारणी कशी करायची, त्याबद्दलसुद्धा मित्रा राज्य सरकारला, आणि पुरातत्व विभागाला मदत करणार आहे. त्यासाठी हा आराखडा आणि बृहत् आराखडा होणे आवश्यक असून नियोजन झालं तरच खासगी निधी किंवा सरकारी निधी किंवा वर्ल्ड बँकचा निधी येऊ शकतो. त्या निधी कसा उभा राहू शकतो या बाबातचा रोड मॅप येत्या दोन वर्षात आराखडे तयार करीत असतानाच करा, अशा सूचना या बैठकीत मंत्री शेलार यांनी दिल्या. या दोन वर्षांत आराखडा तयार होत असतनाच पहिल्या टप्प्यात ज्या ज्या ठिकाणचा बृहत् आराखडा तयार होईल, त्याबाबत पर्यटन विभागाशी चर्चा करून मार्चपर्यंत पहिल्या 15 ज्यामध्ये 5 बारव, 5 मंदिरे आणि 5 किल्ले याचे डेस्टिनेशन मॅनेजमेंट करुन त्या कामांना सुद्धा निधी उभारणीला सुरूवात करा अशा सूचना मंत्री शेलार यांनी दिल्या.
आराखड्यावर निधी उभारणं…
राज्य सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग, मित्रा, मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा राज्याचा हा बृहत् आराखडा आणि एकात्मिक आराखडा करून, यापुढे त्या आराखड्यावर निधी उभारणं या सगळ्यांपर्यंतचा रोडमॅप या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे हे नियोजन आम्ही करीत असून 11 गडकिल्ले आपले महाराष्ट्रातले आणि एक तामिळनाडूमधला हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले युनेस्कोत गेल्यानंतर, त्याला जागतिक वारसा मिळाल्यानंतर, पूर्ण राज्याचा असा एक मोठा आराखडा बनवण्याचं एक ठोस पाऊल आजपासून आपण सुरू करतो आहोत, असे मंत्री शेलार यांनी सांगितले. या कामात सर्व नागरिकांना, सर्व पर्यटनप्रेमींना, सर्व किल्ले आणि गड याच्या संवर्धनासाठी मदत करणाऱ्या सर्व संस्था, यांचंही मार्गदर्शन व मदत करावी असे अवाहन त्यांनी केले आहे.