साडेतीन कोटीच्या वीजचोरी प्रकरणी, भरारी पथकाची कारवाई

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिम राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमे दरम्यान एकुण ३८३ वीजचोरीची […]

WhatsApp Image 2023 04 28 At 8.35.50 PM

WhatsApp Image 2023 04 28 At 8.35.50 PM

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिम राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमे दरम्यान एकुण ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आलेली आहेत या तीन दिवसांमध्ये नागपूर परिक्षेत्रांतर्गत सर्वाधिक १२१, कोकण परिक्षेत्रात ११७, औरंगाबादपरिक्षेत्रात ९२ तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत ५३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. या वीजचोरी प्रकरणांमध्ये मोठया प्रमाणात घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. या वीजचो-या प्रकरणी अंदाजे ३ कोटी ५० लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला असून पुढील कार्यवाही चालू आहे.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात ही मोहिम सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी) मुंबई श्री सुमित कुमार, यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याने ग्राहकांनी वीजचोरी न करता वीजेचा अधिकृत वापर करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Exit mobile version