Download App

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत टोकाची भूमिका घ्यायची नव्हती पण… शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar यांनी देखील माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक गाजू लागली आहे. या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar Explaination on extreme stance in the Malegaon factory elections : माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक गाजू लागली आहे. शनिवारी निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी अजित पवार यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. त्यावेळी त्यांनी ‘माळेगाव कारखान्याचं भलं करायचं असेल तर फक्त अजित पवारच करू शकतो. लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत ठेवणाऱ्यांच्या हाताताच सत्ता देण्याचा निर्धार सभासदांनी करावा. माळेगाव कारखान्याचा चेअरमनही मीच होणार आहे. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करणार.’ असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता शरद पवार यांनी देखील या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलंय हे कशावरून ठरवलं जात आहे. नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर असो किंवा मुंबई असो येथील लोकांना या निवडणुकीचं काय कारायचं आहे? हा स्थानिक प्रश्न आहे. एवढंच काय तर आजू बाजूला जे तालुके आहेत. त्यांचे देखील लक्ष इथे लागलेले नाही. मात्र या निवडणुकीमध्ये इतकी टोकाची भूमिका घ्यायची आमची इच्छा नव्हती. पण एक विशिष्ट स्थिती झाली आणि आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. असं यावेळी शरद पवार म्हणाले.

धक्कादायक! खासगी बँकेने छळलं; मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या बापाची बँकेसमोर आत्महत्या

तसेच ते पुढे म्हणाले की, लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती. पण ठीक जे झालं ते झालं.पण हे आम्ही दीर्घकालीन समजत नाही. हे या कारखान्यापुरतं मर्यादित होतं.आजचा 19000 सभासदांचा प्रश्न आहे. बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता परंतु आता कापूस इथे राहिला नाही. चंद्रराव तावरे यांच्याशी काही लोकांचे बोलणं झालं होतं, त्यांना अडचण होती त्यामुळे आम्ही ताणले नाही. या निवडणुकीत बघत नाही. असंही पवार म्हणाले.

अजितदादांना माळेगावचे चेअरमन व्हायचंय, पण का ?

अजितदादा पवार. (Ajit Pawar) सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री. अर्थमंत्री म्हणून राज्याची तिजोरीही त्यांचाच हातात. याच अजितदादांना आता साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचंय. तो कारखाना आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना. ( Malegaon Sugar Factory) या कारखान्याचे अध्यक्ष होऊन अजितदादांना मोठी खेळी करायची आहे का? यापूर्वी मोठ्या पदावर राहिलेले कोणी कारखान्याचे चेअरमन होते का?
दोन मुख्यमंत्री पदावर असताना साखर कारखान्यांचे चेअरमन

Video : …तर हा आम्ही ‘महाराष्ट्र द्रोहच’ समजू; गर्भित इशारा देत राज ठाकरेंचं शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र

तसा विचार केला तर सध्याचे नेते हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, राजेश टोपे हे आपआपल्या भागातील कारखान्यांचे चेअरमन आहेत. मंत्री हसन मुश्रीफ हे तर जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत.तर दोन मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात कारखान्यांचे अध्यक्षपद सांभाळले. दिवंगत वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या भागातील साखर कारखान्याचे चेअरमन होते. तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे पदावर असताना साखर कारखान्याचे चेअरमन होते. त्याच प्रमाणे अजितदादांना आता कारखान्याचे चेअरमन व्हायचंय. (Ajit Pawar Malegaon Sugar Factor candidate for chairman)

अजितदादांकडे खासगी कारखाने, माळेगाव का हवाय ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अनेक जिल्ह्यात खासगी साखर कारखाने आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात अंबालिका कारखाना हा अजितदादांचा आहे. अजितदादा पवार यांचे खासगी कारखाने दरवर्षी 46 लाख टन ऊस गाळप करतात. माळेगाव कारखाना दरवर्षी 13 लाख टन ऊस गाळप करतो. हा कारखाना अजितदादांनी पुन्हा ताब्यात घ्यायचा आहे. हा कारखाना त्यांच्याकडे आल्यास 60 लाख टन ऊस गाळप क्षमता असलेले कारखाने अजितदादांकडे असतील. त्यातून साखरेचा किंवा ऊसाचा दर ठरविताना अजितदादांची भूमिका महत्त्वाची असेल. त्यामुळे अजित पवार यांना माळेगाव कारखान्याचे अध्यक्षपद हवे आहे. केवळ साखर दर नाही तर त्याला राजकीय किनारही आहे.

follow us