Video : शिंदे जयचंद झाला नसता तर…, मुंबई मनपा निकालावर राऊतांची पहिली वादळी प्रतिक्रिया

मुळात हा पराभव आहे असं आम्ही मानत नाही, आम्ही चांगली लढत दिली, आघाडी घेतली. मनसेला आणखी 10-12 जागा मिळणं अपेक्षित होतं.

News Photo   2026 01 17T113915.069

शिंदे जयचंद झाला नसता तर..., मुंबई मनपा निकालावर राऊतांची पहिली वादळी प्रतिक्रिया

राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचा काल निकाल लागला. (BMC)  प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आणि भाजप-सेनेच्या युतीचाच मुंबईत महापौर दिसणार हे चित्र स्पष्ट झालं. महापालिकतील ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपने अखेर विजयी पताका फडकावली.या सर्व निकालांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशात प्रतिष्ठेच्या बनलेल्या भाजप-शिदेंची सत्ता दिसते आहे. ठाकरेंना मुंबई टिकवता आली नाहीय याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता राऊत म्हणाले,  आमच्या हातामध्ये सत्ता आणि एवढा पैसा असता, तर भाजपलासुद्धा देश टिकवता येणार नाही. फडणवीसांना मुख्यमंत्री पद टिकवता येणार नाही. आणि एकनाथ शिंदेनां त्यांचं जे पद आहे ना, ते टिकवता येणार नाही  अशा शब्दांत राऊतांनी सुनावलं.

मुंबई महानगरपालिकेचा निकाल! मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

शिवसेनेचे विद्यमान 60 नगरसेवक फोडले, त्यातलवे 90 टक्के पराभूत झाले. आम्हाला दोघांना (शिवसेना ठाकरे गट- मनसे) मिळून 71 जागाांवर विजय मिळाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला, त्यामुळे हे सगळे प्रश्न निरर्थक आहेत. सत्ता नाही पण एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भाजपचा, महाराष्ट्र्द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. शनिवार वाड्यावर इंग्रजाचा झेंडा फडकवणाऱ्यांच्या या औलादी आहेत अशा शब्दांत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

मुळात हा पराभव आहे असं आम्ही मानत नाही, आम्ही चांगली लढत दिली, आघाडी घेतली. मनसेला आणखी 10-12 जागा मिळणं अपेक्षित होतं. त्यांचे काही उमेदवार अगीद थोड्या फरकाने पराभूत झाले. पण मनसेचे उमेदवार जिंकून यावेत यासाठी आम्ही सर्वांनी, शिवसैनिकांनी शर्थ केली. बैठका घेतल्या, सर्व प्रकारची मतद केली, लोकांना आवहन केलं पण दुर्दैवाने मनसेचे उमेदवार कमी आले. त्यावर आम्ही एकत्र बसून चर्चा करू असंही राऊत म्हणाले.

ठाकरेंच्या युतीत सर्वधिक फायदा उद्धव ठाकरेंना झाला, राज ठाकरेंना फार फायदा झाला नाही. फडणवीस देखील राज ठाकरेंबद्दल बोलले होते. त्यावर राऊतांनी थेट टीका केली. फडणवीस भांडणं लावतात असं ते म्हणाले. शिवसेना हा मुंबईतला मूळ पक्ष आहे, शिवसेनेची ताकदच आधीच्या महापालिकेत 84 ची होती, आता आम्हीसुद्धा कमी झालो ना. राज ठाकरेंच्या पक्षाला 6 जागा मिळाल्या, ते 20 पर्यंत मजल मारतील अशी अपेक्षा होती, पण निवडणुकांमध्ये पुढे मागे होतच असतं. ठाण्यात भाजपची ताकद मोठी होती असं म्हणतात, पण तिथेही शिंदे आले ना. असंअनेकदा होतं, असंही राऊतांनी सुनावलं.

Exit mobile version