Uddhav Thakeray ‘त्यांनी’ गळ्यात पट्टा घालून घेतला… बाळासाहेबांनी मला गुलामी करायला नाही शिकवले!

पुणे : हिंदुत्वातून उत्तर भारतीय वगळता येणार नाही. आता वेळ आलीय की भारतीयांना हिंदुत्व म्हणजे काय? याचे उत्तर हवे आहे. केवळ एकमेकांचा द्वेष हे हिंदुत्व नाही. मी नेहमीच तुमच्या सोबत असावे अशी इच्छा ठेवली. त्यात काहीच चूक नाही. हिंदुत्व हे आमच्यातले आपलेपणा. त्यांना कोणाचीच गरज नव्हती. तेव्हा बाळासाहेबांनी (Balasaheb Thakeray) आजच्या पंतप्रधानांना वाचवले. अटलजी राजधर्माचे […]

Eknath Shinde Uddhav Thackeray Ani1 1664994215

Eknath Shinde Uddhav Thackeray Ani1 1664994215

पुणे : हिंदुत्वातून उत्तर भारतीय वगळता येणार नाही. आता वेळ आलीय की भारतीयांना हिंदुत्व म्हणजे काय? याचे उत्तर हवे आहे. केवळ एकमेकांचा द्वेष हे हिंदुत्व नाही. मी नेहमीच तुमच्या सोबत असावे अशी इच्छा ठेवली. त्यात काहीच चूक नाही. हिंदुत्व हे आमच्यातले आपलेपणा. त्यांना कोणाचीच गरज नव्हती. तेव्हा बाळासाहेबांनी (Balasaheb Thakeray) आजच्या पंतप्रधानांना वाचवले. अटलजी राजधर्माचे पालन करणार होते. तेव्हा काळाची गरज म्हणून बाळासाहेबांनी शब्द टाकला. तसे झाले नसते तर आज ते इथवर आले असते का?, आमच्यातले काही गळ्यात पट्टा घालून त्यांच्या मागे गेले. मला बाळासाहेबांनी कुणाची गुलामी करायला नाही शिकवले, अशी जोरदार टीका शिवलेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांनी भाजपवर केली.

शिवसेनेने आयोजित केलेल्या उत्तर भारतीय मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांनी कधीही द्वेषभावना ठेवली नाही. आम्ही हिंदू म्हणजे केवळ मराठी आहोत असे नाही आणि हिंदी भाषिकांचा द्वेष करा अशी आमची कधीच भावना आणि कृती नव्हती. हिंदू म्हणजे आपण सगळे एकच. देश विरोधात कुठलाही धर्मीय असो तो आमचा शत्रूच ही बाळासाहेबांची आम्हाला शिकवण. आम्ही भाजपची साथ सोडली हिंदुत्व नव्हे. आम्ही काल, आज आणि उद्यापण हिंदूच. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. त्यांचे हवे तसे हिंदुत्व मी मानत नाही.

दोन वेळा शिवसैनिक रस्त्यावर उतरला १९९२-९३ आणि मी मुख्यमंत्री असतांना कोरोना काळात. मी कधीच मराठी अमराठी, हिंदू मुस्लमान असा भेदभाव केला नाही. आपण पाच वर्ष एकत्र असतो, शाखेत येतात पण निवडणुकीत का वेगळे होतो? ही भाजपची इंग्रज नीती. ह्यांना फक्त सत्तेच्या घोड्यावर बसायचे इतरांनी भांडायचे. मी डोळे उघडायला आलोय द्वेष वाढवायला आलोय. असाच कारभार सुरु राहिला तर हिंदुत्व धोक्यात. गर्व से कहो हम हिंदू ही घोषणा माझ्या वडिलांनी दिली. २०१८ साली मी रामलल्लाच्या दर्शनाला गेलो, शिवजन्मभूमीची माती घेऊन मी रामजन्मभूमीला गेलो. शरयू मातेची आरती केली. कुणी मान्य करो अथवा नाही पण त्यानंतर राम मंदिरावर न्यायालयाचा निकाल आला. मी मुख्यमंत्री पण झालो, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Exit mobile version