Maharashtra Weather Update : विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. येथे अनेक ठिकाणी (Maharashtra Weather Update) अतिमुसळधार पाऊस झाला आहे. नद्यांना पूर (Heavy Rain in Vidarbha) आला आहे. धरणांतूनही पाणी सोडण्यात आले आहे. आज मात्र काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. आजपासून राज्यात पावसाचा (IMD Rain Alert) जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही हलका पाऊस होईल.
कोकण, मराठवाडा अन् विदर्भात जोरधार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज
महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, IMD ने पाच ते आठ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. आजही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी घरे सुरक्षित ठेवून, बाहेर जाण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करावे. राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. उद्यापासून मात्र काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भातही अशीच परिस्थिती आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त होता. अकोला, वाशिम जिल्ह्यांत संततधार पाऊस पडत होता. आजही कोकणातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही भागात मात्र हवामान स्वच्छ राहील अशी स्थिती दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोसळधारा; पंचगंगा धोका पातळी गाठण्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना