Download App

CM शिंदे रमले शेतात, रोटरही चालवला; म्हणाले, ‘मातीचा गंध शेतीकडे खेचून आणतो’

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde : मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेताकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. महाबळेश्व तालुक्यातील दरे येथे  यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असून ते आज बराच वेळ आपल्या शेतात रमले.

संयुक्त किसान मोर्चा पुन्हा सरकारला घेरणार, ‘या’ मागण्यांसाठी १६ फेब्रुवारीला दिली भारत बंदची हाक 

त्यांच्या शेतात औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबा, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवुड यांसारख्या विविध फळझाडे आणि भाज्यांची लागवड केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतीत रमतांना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाटी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूल राहतात. गाव, शेती, गावाकडची माणसं यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्व असते. गावापासून माणूस कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपली माती, गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते.

महाराष्ट्रासह मुंबईच्या विकासात उत्तर भारतीयाचं मोठं योगदान; राज्यपाल बैस यांचं मोठं विधान 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवणारी पिके घ्यावीत, असं सांगून सातारा जिल्ह्यात मिशन मोडवर बांबू लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. सुमारे दहा हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. बांबूला खूप मागणी आहे. शेतकऱ्यांनी बांबूसह रेशीम, सुपारीची लागवड यासारखी उत्पादने एकत्रित करावीत. यामुळे शेतकऱ्यांची नक्कीच आर्थिक उन्नती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कादांडी खोऱ्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ही खोरे निसर्गाने समृद्ध आहे. या खोऱ्यात वासोटा किल्ला, उत्तेश्वर मंदिर अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पर्यटनाला चालना देण्याचे काम केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

follow us