Download App

Ahmednagar Accident: नगर शहरातील उड्डाणपूलावर अपघातात वकिलाचा मृत्यू

अहमदनगर : अखेर अहमदनगरच्या (Ahmednagar) उड्डाणपूलावर पहिला बळी गेलाच. दुचाकीच्या अपघातात नगरमधील अनिरुद्ध रामचंद्र टाक या वकिलाचा मृत्यू (Death) झाला आहे. पुलावरील वळणावर शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, टाक आपल्या दुचाकीवरून जात होते. एक वाहन त्यांना धडक (Accident) देऊन निघून गेले. घटनास्थळी पोहचलेले घरघर लंगर सेवेचे प्रमुख, अहमदनगरचे फूड मॅन हरजीतसिंह वधवा यांनी पोलिसांना फोन केला.

जखमी होऊन टाक यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या खिशातील व्हिजिटिंग कार्ड वरून ओळख पटली. ते एकटेच प्रवास करीत होते. दुचाकील जेवणाचे पार्सल लावलेले होते. त्यांच्या मोबाईल मधील नंबर शोधून हरजीतसिंह आणि पोलीस यांनी टाक यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला.

टाक यांचे कुटुंबीय बाहेर गावी गेलेले असून टाक एकटेच घरी होते. त्यामुळे अन्य नातेवाईक तेथे आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरु केली. हा पूल झाल्यापासून त्यावर छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यातच शुक्रवारी एक मृत्यू झाला. त्यामुळे या पुलाची रचना आणि वाहतूक नियोजनातील त्रुटी यावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us