Download App

Mira Road Murder : सरस्वती, शिक्षण घेऊन मुंबईला गेली ती परतलीच नाही, अहमदनगर कनेक्शन उघडकीस

  • Written By: Last Updated:

Mira Road Murder : मुंबईतील मिरा रोड येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या महिलेची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. मनोज साने याने सरस्वती वैद्य हिला क्रूरपणे संपविले आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी शरीराचे असंख्य तुकडे केले. ते तुकडे कुकरमध्ये शिजविले होते. तर काही तुकडे हे गॅसवर भाजविले होते. मिक्सरने तुकडे बारिक केले होते. या गुन्ह्यात मनोज साने याला अटक झाली आहे. त्याच्याकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहेत. त्या चौकशीत सरस्वती वैद्यबाबत काही माहिती पोलिसांना मिळाली आहे. (mira-road-murder-saraswati-went-to-mumbai-for-her-education-and-never-returned-ahmednagar-connection-revealed-in-the-murder-case)

Crime News : मीरा रोड हत्याकांडात नवा ट्विस्ट; नराधमाचा धक्कादायक खुलासा

सरस्वती ही अनाथ होती. ती नगरची असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. त्यानुसार मुंबई पोलिसांचे एक पथक गुरुवारी नगरमध्ये आले होते. त्यांनी एका संस्थेमध्ये सरस्वतीबाबत विचारपूस केली. नगरमध्ये ती लहानची मोठी झाली. तिने येथेच एका अनाथ आश्रमात शिक्षण घेतले होते. दहा वर्षांपूर्वीच ती संस्था सोडून गेली होती,अशी माहिती पोलिसांना बालिकाश्रम संस्थेच्या प्रशासनाकडून मिळाली आहे.

Mumbai Crime: मिक्सर, कटर अन्…मिरारोड हत्याकांड शेजाऱ्यांनी सांगितला ‘शहारा’ आणणारा घटनाक्रम

सुमारे दोन तास हे पथक नगरमधील संस्थेत होते. सरस्वतीच्या शैक्षणिक कागदपत्र्यांचे पुरावे घेऊन पोलीस पथक मुंबईला रवाना झाले आहे. अटकेत असलेल्या आरोपीकडून सरस्वतीबाबत वेगवेगळी माहिती मिळत आहे. त्यानुसार पोलिस आता गुन्ह्याचा सखोल तपास करणे, सरस्वतीबाबत सखोल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात नगरमधून पोलिसांनी तिच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपासासाठी पोलिसांना पुरावे म्हणून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=YExnJdZGojU

Tags

follow us