Download App

नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ !

  • Written By: Last Updated:

Nitin Desai Death : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओत गळफास घेऊन जीवन संपविले आहे. या धक्कादायक घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई (Nitin Desai) यांचा राजकीय नेत्यांशी संबंध आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातूनही देसाई यांच्या एक्झिटवर हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nitin Desai Death, political leaders pay tribute)

ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत व्यक्ती आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. कलाक्षेत्रात नितीन देसाई यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबीयांवर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


Nitin Desai Suicide: दोन दिवस स्टुडिओतच मुक्काम, घरच्यांशी संपर्क तोडला; अखेरच्या तासांमध्ये नितीन देसाईंसोबत काय घडलं?

महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचं अशा पद्धतीने अचानक निघून जाणे अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारे आहे. सरकारच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांचे मनापासूनचे सहकार्य असायचे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णममहोत्सवाच्या आयोजनात त्यांनी सर्वस्व झोकून काम केलेय प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यात त्यांची नेहमीच मदत व्हायची. नितीन देसाईंच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे.

Nitin Desai Death : देसाईंचं फक्त चार मिनिटांचं प्रेझेन्टेशन अन् PM मोदीही भारावले; ‘तो’ किस्सा वाचाच!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देसाई यांना श्रध्दांजली अर्पण करत एक आठवण सांगितली आहे.
मुख्यमंत्री असताना मरीन लाईन्स येथे आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम व्यवस्थेचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. हा हरहुन्नरी कलावंत असा अचानक आपल्याला सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही श्रद्धांजली अर्पण केली. आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येऊनही त्यावर लीलया मात करणारे तुम्ही, जे करु ते भव्य दिव्यच करू हा ध्यास बाळगणारे तुम्ही … चित्रपटसृष्टीत कर्तृत्वाने मैलाचा दगड ठरलेले तुम्ही, तुमच्या कलासक्तवृत्तीने जग अधिक सुंदर बनविणारे तुम्ही. आयुष्य मोरपंखी आहे. रंग म्हणजे जगणे… आणि रंगात न्हाऊन निघणे म्हणजे आयुष्याचा जलतरंग, असेच म्हणाला होतात तुम्ही. अशी अचानक एक्झिट घ्याल असे कधी वाटलेच नव्हते, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज