Download App

विकसित भारत घडवण्यात मुंबईचं मोठ योगदान असेल; मोदींचा आशावाद

मुंबईत शिवाजी पार्क येथे सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका करत आपण दहशतवाद गाडला असा दावा केला.

Campaign Sabha of PM Modi in Mumbai : ज्यांना राम मंदिर निर्माण होणं अशक्य वाटत होतं, ज्यांना 370 कलम हटवणं अशक्य वाटत होतं, त्यांच्या सर्व अशक्यतांना मी गाढून टाकलंय असं म्हणत पंतप्रदान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसंच, यावेळी (PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नवीन भारत उभा केलाय. गेल्या दहा वर्षात देशाला पाचव्या क्रमांकावर घेऊन गेलो, येत्या काळात भारत हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था असणार आहे असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

 

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात जय भवानी, जय शिवाजी अशी केली. ते म्हणाले की, मुंबई हे शहर फक्त स्वप्न दाखवत नाही तर स्वप्न जगतं. काहीतरी करून दाखवणाऱ्यांना मुंबईने कधीही निराश नाही केलं. या शहरासाठीच्या 2047 सालचे स्वप्न घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आपल्याला एक संकल्प करून विकसित भारत घडवायचा आहे. त्यामध्ये मुंबईचं योगदान मोठं असेल असंही ते म्हणाले.

 

पाच दशकं ही वाया घालवली

लाल किल्ल्यावरून काही पंतप्रधानांनी भारतीयांना आळशी म्हटलं आहे. ते देशाला कधीही पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. मात्र, भारतासोबत स्वतंत्र झालेले अनेक देश हे भारताच्या पुढे गेलेत. कमी भारतीयांमध्ये नव्हती तर इथल्या सरकारमध्ये होती अशी थेट टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली स्वातंत्र्यानंतर गांधींजींनी सांगितलं होतं की काँग्रेस बरखास्त करा. तसं झालं असतं तर देश किमान पाच दशकं पुढे असता. या सत्ताधाऱ्यांनी देशाची पाच दशकं ही वाया घालवली असा घणाघातही त्यांनी केला.

 

चणे खाण्याचं काम नाही

सन 2014 मध्ये भाजप सत्तेत आलं त्यावेळी देश जगातला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली. येत्या काही काळात देश जगातली सर्वात मोठी तिसरी आर्थिक ताकद असणार आहे ही मोदींची गॅरंटी आहे असंही मोदी म्हणाले. मी तुमच्या मुलांना एक विकसित भारत देऊन जाणार आहे. त्यासाठी मी 24 तास देशासाठी काम करणार आहे. निराशेच्या गर्तेमध्ये असलेल्या लोकांमध्ये आशा निर्माण करणं हे काही चणे खाण्याचं काम नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

 

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात जय भवानी, जय शिवाजी अशी केली. ते म्हणाले की, मुंबई हे शहर फक्त स्वप्न दाखवत नाही तर स्वप्न जगतं. काहीतरी करून दाखवणाऱ्यांना मुंबईने कधीही निराश नाही केलं. या शहरासाठीच्या 2047 सालचे स्वप्न घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आपल्याला एक संकल्प करून विकसित भारत घडवायचा आहे. त्यामध्ये मुंबईचं योगदान मोठं असेल असंही ते म्हणाले.

Tags

follow us