Download App

बाळासाहेब अन् पवारांचा फोटो अन् सुप्रिया सुळेंचे भल मोठं ट्विट; म्हणाल्या, तत्वशून्य फोडाफोडीतून..

  • Written By: Last Updated:

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. राष्ट्रवादीतील शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून अनेक नेत्यांनी भाजपकडून केल्या जाणाऱ्या फोडाफोडीवर उघडपणे हल्लाबोल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेदेखील (Supria Sule) वेळोवेळी यावर भाष्य करताना दिसतात. मात्र, आज (दि. 22) त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा फोटो पोस्ट करत एक भल मोठं ट्विट केले आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील जनतेमध्ये आपापसात भांडणे लावून, त्यांची ताकद खच्ची करून भाजपला आनंद मिळतो, परंतू या तत्वशून्य फोडाफोडीतून राज्याची प्रतिमा मालिन करण्याचे पाप भाजपला करत असल्याचे म्हटले आहे. (Supria Sule Tweet On BJP Politics )

तीन महिने विधानसभा अध्यक्षांनी काय केलं? रोहित पवारांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

सुप्रिया सुळेंचे ट्विट नेमकं काय?

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण ‘मराठी माणूस’ अशी मराठी माणसाची व्याख्या केली होती. महाराष्ट्रीय माणसांनी प्रचंड मेहनत करुन, प्रागतिक विचार जोपासत विकसित महाराष्ट्राची उभारणी केली. अनेक क्षेत्रांत देशाला दिशा दाखविण्याचे काम केले. पण केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने येनकेनप्रकारे मराठी माणसांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शिवसेना (@ShivSenaUBT_) आणि राष्ट्रवादी (@NCPspeaks) हे पक्ष विधिनिषेध शून्य मार्गांनी फोडले.

स्व. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली. त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी (@PawarSpeaks) देखील राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करुन ती देशभरात पोहोचविण्याचे काम केले. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कुटुंबाचा समाजकार्याचा वारसा घेऊन प्रचंड मेहनतीने डोंगराएवढे कार्य उभे केले व देशभरात दबदबा निर्माण केला.

खडसेंना सगळी पदं घरातच पाहिजेत; रावेर लोकसभेच्या दाव्यावरून गिरीश महाजनांचा टोला

गेली साठ वर्षे या दोन्ही नेत्यांचे विचार आणि नेतृत्व मान्य करुन लाखो कार्यकर्त्यांनी हे पक्ष उभे केले. याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ॠणात आहोत. देशातील व महाराष्ट्रातील मायबाप जनतेने स्व.बाळासाहेब ठाकरे व आदरणीय पवार साहेबांना भरभरून प्रेम दिले. पण त्यांची ही ताकद व हे प्रेम भाजपला (@BJP4India) बघवत नाही.

आदरणीय पवार साहेबांनी तीन वेळा कर्करोगाशी झुंज दिली. प्रत्येक वेळी ते जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद यांच्या बळावर जनसेवेसाठी बरे होऊन पुन्हा कामाला लागले. यासाठी माय-बाप जनतेचे आम्ही कायम ऋणी आहोत. महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे. त्यासाठी केंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातोय, पाण्यासारखा पैसा ओतला जातोय.

India vs Canada : 8 लाख मतांच्या लोण्यासाठी जस्टिन ट्रूडो घेतायत भारताशी पंगा…

महाराष्ट्रातील जनतेमध्ये आपापसात भांडणे लावून, त्यांची ताकद खच्ची करून भाजपला आनंद मिळतो, परंतू या तत्वशून्य फोडाफोडीतून राज्याची प्रतिमा मालिन करण्याचे पाप भाजपला करत आहे.लोकशाही व्यवस्थेत अत्यावश्यक असणारी विरोधी पक्षांची आणि विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही, हेच सातत्याने अधोरेखित होते आहे.

Tags

follow us