Download App

संविधानातील धर्मनिरपेक्षता शब्द काढून टाकावा; भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांचं वादग्रस्त वक्तव्य

आरएसएसने संविधानाच्या प्रस्तावनेतील 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' या शब्दांचा आढावा घेण्याची मागणी केली होती.

  • Written By: Last Updated:

Shivraj Singh Chauhan on Secularism : आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय कृषी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी संविधानातून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द काढून टाकायला हवेत (Secularism) असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने देशभरात वाद पेटला आहे. भारतीय संस्कृतीत या भावना आधीच अस्तित्वात आहेत असं त्यांचं मत आहे. त्यामुळे संविधानात या शब्दांची विशेष आवश्यकता नाही.

आरएसएसने गुरुवारी संविधानाच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दांचा आढावा घेण्याची मागणी केली. त्यांनी म्हटलं की, आणीबाणीच्या काळात हे शब्द समाविष्ट करण्यात आले होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा ते कधीही भाग नव्हते. आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे म्हणाले, “हे शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत कधीच नव्हते.

तो अहवाल ठाकरेंनीच स्वीकारला, तेव्हा कुठे गेले होते तुमचे मातृभाषा प्रेम?, सामंतांचा सवाल

मूलभूत अधिकार निलंबित असताना, संसद काम करत नसताना, न्यायव्यवस्था लकवाग्रस्त असताना आणीबाणीच्या काळात हे शब्द जोडले गेले होते. त्यांनी सांगितलं की या मुद्द्यावर नंतर चर्चा झाली. परंतु, प्रस्तावनेतून ते काढून टाकण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. होसाबळे म्हणाले, “म्हणून ते प्रस्तावनेत राहावं की नाही याचा विचार केला पाहिजे.

तथापि, शिवराज सिंह म्हणाले की, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द संविधानातून काढून टाकले पाहिजेत. प्राचीन शास्त्रांचा हवाला देत ते म्हणाले की, या शब्दांमधील भावना भारतीय संस्कृतीचा एक भाग आहेत. शिवराज सिंह म्हणाले, ‘सर्वप्रथम, मी हे सांगू इच्छितो की मी बाबा विश्वनाथांच्या भूमीवर बसलो आहे. भारत हे एक अतिशय प्राचीन आणि महान राष्ट्र आहे आणि भारताची मूळ भावना सर्व धर्मांमधील सद्भावना आहे.’ भारत नेहमीच सर्व धर्मांचा समान आदर करणारा देश राहिला आहे.

follow us