ब्रेकिंग : मोदी सरकारने अखेर विरोधकांपुढे टेकले गुडघे; संचार साथीची सक्ती मागे घेण्याची घोषणा

केंद्र सरकारने देशात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर "संचार साथी" सायबरसुरक्षा अॅप प्री-इंस्टॉल करणे बंधनकारक करणारा आपला आदेश मागे घेतला आहे.

ब्रेकिंग : मोदी सरकारने अखेर विरोधकांपुढे टेकले गुडघे; संचार साथीची सक्ती मागे घेण्याची घोषणा

ब्रेकिंग : मोदी सरकारने अखेर विरोधकांपुढे टेकले गुडघे; संचार साथीची सक्ती मागे घेण्याची घोषणा


Communication partner forced withdrawal : केंद्र सरकारने देशात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर “संचार साथी” सायबरसुरक्षा अॅप प्री-इंस्टॉल करणे बंधनकारक करणारा आपला आदेश मागे घेतला आहे. अॅपल(Apple)सारख्या कंपन्यांसह सर्व मोबाइल फोन उत्पादकांना देण्यात आलेले आदेश मागे घेण्यात येत असल्याचे एका सरकारी निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून दोन दिवसांपासून याला तीव्र विरोध केला होता. त्यानंतर संचार सक्ती करण्याचे आदेश मागे घेण्यात आले आहेत. सरकारच्या या भूमिकेनंतर मोदी सरकराने विरोधकांपुढे गुडघे टेकल्याचे बोलले जात आहे.

संचार साथी नेमकं काय?
संचार साथी हे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचं एक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मोबाईल आणि यूजर्सची सुरक्षा वाढवणे आणि सरकारी डिजिटल सेवांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. 16 मे 2023 साली रोजी तत्कालीन दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे अ‍ॅप लाँच केले होते

संचार साथीचे फायदे काय?
संचार साथीमध्ये “ब्लॉक युवर लॉस्ट/स्टोलन मोबाईल” नावाची सुविधा आपल्याला मिळते. ज्यामुळे आपला मोबाईल जर चोरीला गेला तो फोन शोधण्यात आपल्याला मदत होते. या माध्यमातून देशभरातील सर्व नेटवर्कवर असलेले फोन ब्लॉक केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत जर कोणी फोन चालू करण्याचा प्रयत्न केला तर त्याची लोकेशन देखील लगेच ट्रेस करणे शक्य होते. यामध्ये नो मोबाईल कनेक्शन्स इन युअर नेमचे फिचर पाहायला मिळते. ज्यामुळे तुमच्या नावावर किती सिम कार्ड सध्या अ‍ॅक्टिव्हेट आहेत याची इत्यंभूत माहिती मिळणे देखील शक्य होणार आहे. एखादा नंबर तुम्ही कधीही वापरला नसेल तर, त्याबाबत त्वरित तक्रार या माध्यमातून करण्यात येते.

लोकप्रतिनिधी आहात जरा कायद्याने वागा; आम्ही कायद्यानेच वागतो, आजी माजी आमदार आमने-सामने

फोन अनब्लॉक करणे शक्य
तुमचा मोबाईल फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास, तुमचा डेटा कुठेही जाऊ नये यासाठी ‘संचार साथी’ ॲपद्वारे तो ब्लॉक देखील करता येणार आहे. जर, तुम्हाला फोन परत मिळाला, तर तुम्ही तो याच ॲपद्वारे अन-ब्लॉक देखील करू शकता. ॲपमध्ये ‘चक्षु’ सर्विस. याचा वापर करून, वापरकर्त्यांना आलेल्या कोणत्याही संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेसची तक्रार करता येते. तुमचा फोन बनावट आहे की नाही हे तपासण्यासाठी ‘संचार साथी’ ॲप मदत करते. याची प्रोसेस देखील सोपी आहे. यामध्ये फक्त तुमच्या फोनचा १५ अंकी IMEI नंबर टाका आणि झालं. हे फीचर फोनचा ब्रँड, मॉडेल नंबर आणि निर्मितीची माहिती दाखवतो. ज्यामुळे तुम्ही बनावट फोन खरेदी करण्यापासून वाचू शकता.

परदेशी कॉल्सची तक्रार
जर तुम्हाला भारतीय मोबाईल नंबरवरून परदेशातून आलेला कॉल आल्यास, त्याची तक्रार या ॲपद्वारे करता येते. यासाठी तुम्हाला कॉलचा नंबर, वेळ आणि देशासारखे तपशील देऊन तक्रार नोंदवावी लागणार आहे. यामुळे फ्रॉड कॉल्सला आळा घालण्यास मोठी मदत होणार आहे.

 

 

Exit mobile version