ओडिशामध्ये 3 ट्रेन धडकल्या! कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताचे मुख्य कारण उघडकीस

Coromandel Express Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चार डबे रुळावरून घसरुन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीनशेहून अधिक प्रवासी जखमी झाले असून आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीला धडकल्याने एवढा मोठा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता एकाच रुळावर तीन गाड्या कशा […]

UPSC Exam (5)

UPSC Exam (5)

Coromandel Express Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चार डबे रुळावरून घसरुन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीनशेहून अधिक प्रवासी जखमी झाले असून आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीला धडकल्याने एवढा मोठा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता एकाच रुळावर तीन गाड्या कशा येतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागचे मुख्य कारण काय समोर आले आहे.

एका रुळावर दोन गाड्या कशा येतात
यामागे दोन कारणे आहेत. पहिली मानवी चूक आणि दुसरी तांत्रिक चूक. या अपघातामागे तांत्रिक बिघाड असल्याचे अद्यापही मानले जात आहे. सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने दोन गाड्या एकाच रुळावर आल्या आणि त्यांची टक्कर झाली. वास्तविक, ड्रायव्हर कंट्रोल रूमच्या सूचनेनुसार ट्रेन चालवतो आणि ट्रॅकवरील ट्रॅफिक पाहून कंट्रोल रूमकडून सूचना दिल्या जातात. यासाठी प्रत्येक रेल्वे कंट्रोल रूममध्ये एक मोठा डिस्प्ले बसवलेला असतो. त्या डिस्प्लेवर कोणत्या ट्रॅकवर ट्रेन आहे आणि कोणता ट्रॅक रिकामा आहे हे दिसते.

हे हिरव्या आणि लाल रंगाच्या दिव्यांद्वारे दाखवले जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या ट्रॅकवर ट्रेन धावत असेल तर ती लाल दर्शवेल आणि जो ट्रॅक रिकामा असेल तो हिरवा दर्शवेल. हे पाहून नियंत्रण कक्षाकडून लोको पायलटला सूचना दिल्या जातात. मात्र यावेळी या अपघाताची गंभीरता पाहून वाटते की डिस्प्लेवर ट्रेनचा सिग्नल बरोबर दाखवला गेला नाही आणि त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला.

Exit mobile version