Download App

निवडणूक काळात धडकी भरवणारी ‘आदर्श आचारसंहिता’ जाहीर : तीन महिने काय बदलणार?

देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. यानंतरच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांना या आदर्श आचारसंहितेचे पालन करावेच लागते. यातही राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना या नियमांचे आणि अटींचे काटेकोर पालन करावेच लागते. यातील नियम आणि अटींचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास निवडणूक आयोग आणि पोलीस यांच्याकडून कडक कारवाई केली जाते. त्यामुळेच या आदर्श आचारसंहितेची सर्वांनाच धास्ती लागलेली असते. (Lok Sabha election announced, what exactly is the ideal code of conduct?)

पण ही आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमके आहे तरी काय? आणि तिची धास्ती का घेतली जाते? पाहुया सविस्तर

आदर्श आचारसंहिता म्हणजे काय याबद्दल अगदी थोडक्यात म्हणजे एकाच ओळीत सांगायचे तर “निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये याबद्दल आखून दिलेली नियमावली. याच नियमावलीला आदर्श आचारसंहिता असे म्हटले जाते.

आचारसंहितेचे नियम काय सांगतात? जाणून घेऊयात.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर, मतदानाच्या दिवशी आणि त्यानंतर निकाल लागेपर्यंत अशा तीन टप्प्यांमध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी होत असते. या तिन्ही टप्प्यांमध्ये राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचा व्यवहार कसा असावा, निवडणुकांदरम्यान पक्षांच्या भूमिका कशा असाव्यात, मतदानादिवशी मतदान केंद्रावर काय करता येते आणि काय नाही अशा अनेक नियमांचा या आचारसंहितेत समावेश आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास काय कारवाई होते?

follow us