ममता बॅनर्जींनी राहुल गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसचा पलटवार; म्हणाले, मोदींना खुश करण्यासाठी…

नवी दिल्ली : टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी 2024 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला केला. राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राहुल गांधी (Rahul Gandhi) विरोधी पक्षनेते राहिले तर मोदींना (PM Modi) कोणीही हरवू शकणार नाही. कारण राहुल गांधी हा मोदींचा सर्वात मोठा टीआरपी आहे. आता काँग्रेसने ममता […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (55)

Congress MP Adhir Ranjan Chaudhary

नवी दिल्ली : टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी 2024 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला केला. राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राहुल गांधी (Rahul Gandhi) विरोधी पक्षनेते राहिले तर मोदींना (PM Modi) कोणीही हरवू शकणार नाही. कारण राहुल गांधी हा मोदींचा सर्वात मोठा टीआरपी आहे. आता काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार प्रहार केला.

‘राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहिले तर नरेंद्र मोदींना कोणीही टार्गेट करू शकत नाही’ या ममता बॅनर्जींच्या विधानावर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, ‘मोदीजींच्या आदेशानुसार आणि सूचनेनुसार ममता बॅनर्जी हे बोलत आहेत. ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये सिद्ध केले आहे की त्यांच्या आणि पीएम मोदी यांच्यात करार आहे.

काँग्रेस आणि राहुल गांधींना नष्ट करणे हा दीदींचा उद्देश

अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राहुल गांधी यांना नष्ट करणे आणि त्यांची प्रतिमा डागाळणे हा त्यांचा उद्देश आहे. ममता बॅनर्जींचा नारा बदलला आहे, त्यांना ईडी-सीबीआयला टाळायचे आहे, जो काँग्रेसला विरोध करेल त्याच्यावर मोदी खुश असतील. पंतप्रधान मोदींना खूश करण्याचा त्यांचा सर्वात मोठा प्रयत्न आहे.

दुसरीकडे, भाजपचे राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव म्हणाले, ‘राहुल गांधी देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे त्यांचे नेतृत्व कोणीही स्वीकारणार नाही. ते देशाच्या शत्रूंची भाषा बोलतात आणि त्यांना पाठिंबा देतात. राहुल गांधींचे संसद सदस्यत्वही रद्द करावे.

ममता बॅनर्जींनी राहुल गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसचा पलटवार; म्हणाले, मोदींना खुश करण्यासाठी…

खरं तर, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रविवारी (19 मार्च) TMC कार्यकर्त्यांना संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि राहुल गांधींवर शाब्दिक हल्ला चढविला. राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहिले तर नरेंद्र मोदींना कोणीही हरवू शकत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी हे पीएम मोदींसाठी टीआरपीसारखे आहेत.

ममता म्हणाल्या, ‘राहुल गांधी जे बोलतात ते भाजप अतिशयोक्ती करतो. लंडनमधील त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यापासून ते भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी घातलेल्या दाढी आणि टी-शर्टपर्यंत, भाजपने त्याला सतत चर्चेचा मुद्दा बनवले आहे. २०२४ च्या लोकसभा प्रचाराचे मोदी विरुद्ध राहुल या लढतीत रूपांतर व्हावे अशी भाजपची इच्छा आहे.

Exit mobile version