Misread Data Sanjay Kumar : राजकीय विश्लेषक आणि लोकनिती CSDS चे समन्वयक संजय कुमार यांनी माफी (Sanjay Kumar) मागितली आहे. संजयकुमार यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यावर त्यांनी माफी मागितली आणि या संदर्भात केलेले ट्विटही डिलीट केले आहेत. यात महत्वाची गोष्ट म्हणजे संजयकुमार यांच्या यांच्या याच आकडेवारीचा आधार घेत काँग्रेसने निवडणूक आयोगावर तुफान (Election Commission) हल्ला चढवला होता. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी तर अनेक वेळा संजयकुमार यांच्या ट्विटचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला घेरले होते. दरम्यान, या ट्विट संदर्भात संजयकुमार माफी मागताना म्हटले की सन 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीची तुलना करता चूक झाली होती. संबंधित ट्विट आता डिलीट केले आहेत.
संजयकुमार यांनी 17 ऑगस्ट रोजी काही पोस्ट केल्या होत्या. यात त्यांनी दावा केला होता की लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील दोन जागांवर मतदारांची संख्या वेगानी कमी झाली. रामटेक विधानसभा मतदारसंघात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 4 लाख 66 हजार 203 मतदार होते. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांची संख्या 2 लाख 86 हजार 931 राहिली.
I sincerely apologize for the tweets posted regarding Maharashtra elections.
Error occurred while comparing data of 2024 LS and 2024 AS. The data in row was misread by our Data team.
The tweet has since been removed.
I had no intention of dispersing any form of misinformation.
— Sanjay Kumar (@sanjaycsds) August 19, 2025
संजयकुमार यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये या जागेवर 1 लाख 79 हजार 272 म्हणजेच 38.45 टक्के मते कमी पडली. याच पद्धतीने देवळाली विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी दिली होती. देवळालीत लोकसभा निवडणुकीत 4 लाख 56 हजार 72 मतदान झाले होते. तर विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या मात्र 2 लाख 88 हजार 141 राहिली. या मतदारसंघात 1 लाख 67 हजार 931 म्हणजेच 36.82 टक्के मते कमी पडली असा दावा संजयकुमार यांनी केला होता.
मतचोरी प्रकरण, विरोधक आक्रमक; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी
चुकीची माहिती देण्याचा उद्देश नव्हता : संजयकुमार
दरम्यान, संजयकुमार यांनी आता हे ट्विट डिलीट केले आहेत तसेच माफी देखील मागितली आहे. महाराष्ट्र निवडणुकी संदर्भात मी जे ट्विट केले होते त्याबद्दल प्रामाणिकपणे माफी मागतो. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील माहितीची तुलना करताना त्रुटी राहिल्या. आमच्या डेटा टीमने चुकीच्या पद्धतीने माहिती वाचली. आता हे ट्विट मी डिलीट केले आहेत. चुकीची माहिती प्रसारित करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता.
संजयकुमार यांच्यावर भाजपाची टीका
संजयकुमार यांच्या या माफीनाम्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केलं आहे. माफी आली आहे पण संजयकुमार बाहेर आहेत. योगेंद्र यादव यांच्या या शिष्याने कधी काय बरोबर केलं होतं. प्रत्येक निवडणुकीच्या आधी त्यांच्या प्रत्येक भविष्यवाणीत भाजप हरतानाच दिसत असतो पण नंतर त्यांचा दावा उलटा पडतो. नंतर मग ते टिव्हीवर येऊन समजावून सांगतात की भाजपा कसा विजयी झाला. त्यांना वाटतं की टिव्ही पाहणारे लोक मुर्ख आहेत अशी टीका मालवीय यांनी संजयकुमार यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्राच्या मतदारांना बदनाम करण्यासाठी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) ज्या संस्थेच्या माहितीवर विश्वास ठेवला त्यांनीच आता स्वीकारले आहे की आम्ही दिलेली माहिती चुकीची होती. फक्त महाराष्ट्रच नाही तर एसआयआरच्या संदर्भातही त्यांनी चूक मान्य केली आहे, असे अमित मालवीय यांनी सांगितले.