Sumit Sarbhwal the pilot of the crashed Air India plane in Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले असून या विमानात 242 लोक होते अशी माहिती समोर आली आहे. अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) विमानतळाजवळील मेघानीनगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. तर दुसरीकडे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) देखील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता या विमानाचे पायलट सुमीत सरभवाल नेमके कोण होते? त्यांचा अनुभाव काय होता? हे सर्व मुद्दे चर्चेत आले आहेत.
पायलट सुमीत सरभवाल कोण होते?
एएनआयने डीजीसीएच्या माहितीनुसार सांगितले की, एअर इंडियाच्या या अपघातग्रस्त विमानाचे पायलट सुमीत सरभवाल होते. त्यांना 8200 तासांचा विमान उडवण्याचा एलटीसी म्हणून अनुभव आहे. तर त्यांना 1100 तासांचा सह पायलट म्हणून उड्डाणाचा अनुभव आहे. टीसीने सांगितल्यानुसार या विमानाने अहमदाबादच्या (Ahmedabad Plane Crash) रनवे 23 वरून भारतीय वेळेनुसार 1 वाजून 39 मिनिटांनी उडाले होते. त्यानंतर लगेचच विमान हे विमान तळाच्या परिघा बाहेर एका इमारतीवर पडलं आहे. त्यानंतर तेथे मोठे आगीचे लोट निर्माण झाले होते.
आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला?
अहमदाबाद पोलिस कंट्रोल रूमने देखील याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून (Ahmedabad Plane Crash) लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानामध्ये 242 प्रवासी होते. टेकऑफनंतर 15 मिनिटांत लगेच विमान दुर्घटना झाली. ही घटना मेघानीनगर परिसराजवळ घडली आहे. दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले. आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याची आकडा अजून समोर आलेला नाही. परंतु शेकडो प्रवासी अपघातग्रस्त आहेत.
अपघात नेमका कसा झाला?
फ्लाइट एआय 171 अहमदाबादहून लंडनला जात होती. अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ दरम्यान कोसळले. बोईंग विमानाने आधी पेट घेतला आणि नंतर कोसळलं. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचं देखील सांगितलं जातंय. विमान अपघातामुळे परिसरातील इमारतींचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.