Download App

‘Aditya Thackeray भाजपच्या जिवावर निवडून आलेत’

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेलार म्हणाले, स्वकर्तृत्वार जो उभा आहे, त्यानेच आव्हान द्यावं. आदित्यजी तुम्ही वरळीत जिंकून आलात ते भाजपाच्या जिवावर, आमच्या जिवावर निवडून येऊन आमच्याच मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) प्रतिआव्हान देत असाल तर तुम्ही यशस्वी झालेला नाहीत आणि अपयशी माणसानं कधीच कुणाला प्रतिआव्हान देऊ नये, अशी घनाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी अशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

भाजप नेते शेलार म्हणाले की, राजकारणात आव्हान प्रतिआव्हान द्यायला काहीच हरकत नाही, पण यशस्वी स्वकर्तृत्वार जो नेता उभा असेल त्यानं आव्हान द्यायला पाहिजे. आदित्य ठाकरे हे वरळीत जिंकून आलेत ते भाजपच्या जिवावर आणि आमच्याच जिवावर निवडून येऊनही आमच्याच मुख्यमंत्र्यांना आव्हान देत असतील तर तुम्ही अजून यशस्वी नाहीत. आणि अपयशी माणसानं कोणाला आव्हान देऊ नये, अशी टीका आदित्य ठाकरेंवर केली आहे.

यावेळी आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचे हात रक्ताने माखलेले आहे, अशी जहरी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. राजकारणात आदित्य ठाकरे स्वकर्तृत्वार यशस्वी नाहीत, त्यांनी आधी स्वकर्तृत्वार यशस्वी व्हावं नंतर यशस्वी नेत्यांना आव्हान द्यावं असंही ते यावेळी म्हणाले.

Tags

follow us