Keshav Upadhye On Udhav Thackeray : सध्या राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन (Hindi Compulsary) राजकारण ढवळून निघालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 6 जुलैला मोर्चाची घोषणा केल्यानंतर या मोर्चात उद्धव ठाकरेंसह पक्षही सामिल होणार असल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हिंदी भाषेवरुन उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा अहवाल का स्विकारला? असा थेट सवाल उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून केलायं.
मुळात गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा हा प्रयत्न आहे यांना मराठी भाषेचे काहीच देणघेण नाही हे प्रखर वास्तव आहे.
जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा… किती हास्यास्पद… जनतेच्या लक्षात येणार नाही?
महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे हिंदीची सक्ती नाहीच तरी साप साप म्हणत भुई ढोपटण्याच काम… https://t.co/qyGqp60lqc
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 27, 2025
केशव उपाध्ये ट्विटमध्ये म्हणाले, गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, यांना मराठी भाषेचे काहीच देणंघेणं नाही हे प्रखर वास्तवर आहे. जो मुद्द्याच नाही, त्यावर मोर्चा किती हास्यास्पद..जनतेच्या लक्षात येणार नाही? महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाहीच, तरी साप साप म्हमत भुई ढोपटण्याचं काम सुरु असल्याचं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
शिक्षणासाठी न थांबणाऱ्या मुली, कमळीच्या सायकलींवर भविष्याकडे धावणार; 100 शाळकरी मुलींना सायकल वाटप
तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा अहवाल का स्विकारला? त्याचं उत्तर मोर्चा काढण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवं..याच माशेलकर समितीने त्रिभाषा सुत्राचा हिंदीचा आग्रह धरला होता…असंही उपाध्ये यांनी म्हटलंय.
या ट्विटमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलायं. महापालिकेच्या मराठी शाळा इंग्रजी करण्याचा घाट आदित्य ठाकरे यांनी घातला होता. त्यावेळी मराठी प्रेम कुठं गेलं होतं..असा थेट सवाल उपाध्ये यांनी आदित्य ठाकरे यांना केलायं.
दरम्यान, हिंदी भाषा सक्तीविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाला उद्धव ठाकरे, शरद पवार, उपस्थित राहणार आहेत की नाही? याबाबत अद्याप अधिकृतपणे राज ठाकरेंकडून सांगण्यात आलेलं नाही. मात्र, दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावरुन सत्ताधारी पक्षांकडून टीका-टिप्पणी होत असल्याचं चित्र आहे. त्यातच आता पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या दृष्टीने हा मोर्चा ठरणार आहे.