Download App

व्यक्तिगत, मर्यादाबाह्य टीका अशोभनीय…; पडळकरांच्या वक्तव्यावर बावनकुळे स्पष्टच बोलले…

  • Written By: Last Updated:

Chandrasekhar Bawankule : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू तर सुळे लबाड लांडग्याची लेक अशी टीका त्यांनी केली होती. तर दरम्यान, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) यावर प्रतिक्रिया दिली. व्यक्तिगत व मर्यायाबाह्य टीका करणं, हे अशोभनीय असून भाजपच्या संस्कृतीला शोभणारे विधान नाही, असं त्यांनी सांगितलं.

https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0

राजकीय मतभेद असतील, पण मनभेद निर्माण करून व्यक्तिगत व मर्यायाबाह्य टीका करणं, हे अशोभनीय आहे. हे राज्याच्या संस्कृतीला तसेच भाजपच्या संस्कृतीला शोभणारे विधान नाही, असं बावनकुळे म्हणाले. ते म्हणाले, पडळकरांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची दखल घेतली असून नाराजी व्यक्त केली. आपण पडळकर यांच्याशी चर्चा केली असं सांगून पडळकरांच्या विधानाबद्दल पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलं आहे.

ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, प्रत्येकाला समाज महत्वाचा असून त्याबाबतच्या समस्या मांडाव्याच लागतात, न्याय मिळवून द्यावा लागतो. धनगर समाजात आजही मागासलेपणा असून मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार पडळकर यांची भूमिका महत्त्वाची आहे. धनगर समाजाला न्याय मिळावा, हीच भाजपची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला सर्वांचे समर्थन मिळाले असून उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्यानेच आरक्षण टिकले नाही, असं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज संसदेच्या कायद्यानुसार सुरू आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने प्रभावशाली व्यक्ती राष्ट्रपती म्हणून मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचा नेहमीच आदर केला आहे. विरोधकांच्या इन्डी आघाडीचे लोक राजकारण करून संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांच्या घटक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्माचा अपमान केला असून, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी ते नवे रान उठवित आहेत, असं बावनकुळे म्हणाले.

प्लॅन बी कशाला?

विरोधकांना काहीच सुचन नसल्याने हा प्लॅन बी नावाचा फुसकी बॉम्ब सोडला आहे. भाजपकडे कोणताही प्लॅन बी नाही, मला याबद्दल काहीही माहिती नाही. महायुतीचं लक्ष्य लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे आहे. मोदींच्या कामांमुळे सगळे त्यांच्याकडे पाहूनच मतदान करतील.

रोहित पवारांना वाटतेच मीच वारसदार!
अजित पवार आमच्याकडदे आल्यावर रोहित पवार यांनी संधी दिसू लागली. त्यामुळं शरद पवारांचा मीच वारसदार आहे, असं त्यांना वाटू लागलं असावं. अर्थहीन गोष्टी शोधून काढण्यात ते व्यस्त आहेत. भरती प्रक्रियेत येत आरक्षणाच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागतो, त्यावेळेपुरते काम थांबू नये म्हणून कंत्राटी भरती केली जाते, यात वेगळे असे काहीही नाही.

Tags

follow us