Download App

Narayan Rane म्हणतात “U आणि R ने मुंबई लुटली” हे U आणि R कोण ?

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : “मागच्या २५ वर्ष ज्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका होती त्यांनी मुंबई लुटली. प्रत्येक कामाचे १५ – २० टक्के घेतले गेले.” अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “U आणि R यांनी मुंबई लुटली.” त्यामुळे नारायण राणे यांनी नक्की कोणाकडे बोट दाखवल याची चर्चा सुरु आहे.

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर माध्यमांशी बोलताना नारायण राणे बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली. बजेटवर अभ्यास नसणारे बजेटवर बोलतात अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्राला काही मिळाल नाही, या टिकेवर बोलताना त्यांनी केंद्राने जाहीर केलेल्या योजना राज्यालाही मिळतात. अस ते म्हणाले. मुंबईला काहीच मिळाल नाही, यावर बोलताना त्यांनी मागच्या २५ वर्ष ज्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका होती त्यांनी मुंबई लुटली. प्रत्येक कामाचे १५ – २० टक्के घेतले गेले. U आणि R यांनी मुंबई लुटली. अशी टीका त्यांनी केली.

Tags

follow us