चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो? सुषमा अंधारेंचा सवाल

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खेडच्या सभेत जोरदार भाषण केलंय. या भाषणाच्या वेळी त्यांनी भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केलीय. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर टीका करताना चोर असा शब्दप्रयोग केला होता. त्यांच्या टीकेवरुन विधानसभेत त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची […]

Sushma Andhare Ashish Shelar

Sushma Andhare Ashish Shelar

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खेडच्या सभेत जोरदार भाषण केलंय. या भाषणाच्या वेळी त्यांनी भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केलीय. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर टीका करताना चोर असा शब्दप्रयोग केला होता. त्यांच्या टीकेवरुन विधानसभेत त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची मागणी केली जाते. याच मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंनी भाजप नेते आशिष शेलारांवर (Ashish Shelar) निशाणा साधलाय. संजय राऊत म्हणाले की सभागृहात काही चोर बसले आहेत. तिथं काही चोर बसले आहेत असं ते म्हणतात, तेव्हा त्या सभागृहात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीचे (NCP)आमदार आहेत. त्यापैकी कोणालाही आमदारांना राग येत नाही. राग फक्त आशिष शेलारांना येतो, असं सुषमा अंधारे म्हणाल्या, मग चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो असा सवाल यावेळी केलाय.

आशिष शेलारांना राग येतो. अब हम इतनाही बोल रहे है की, अरे भाई चोर के दाढी में तिनका है, तो जो चोर होगा वो अपनी दाढी टटोलेगा. आशिष शेलार अपनी दाढी क्यूँ टटोल रहे हैं. चोर म्हटल्यावर शेलारांना का राग येतो? हा खरा चर्चेचा विषय असला पाहिजे, असंही यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

रामदास कदम हा तात्या विंचू, त्याला पुरून उरू; भास्कर जाधवांचा घणाघात

त्याचवेळी अंधारे म्हणाल्या की, विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, जे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणताहेत की, आम्हाला चोर म्हटलेलं आवडलेलं नाही, त्याच आशिष शेलारांना आणि देवेंद्र फडणवीसांना एका दुसऱ्या गोष्टीचा विसर पडतोय की, त्यांच्याच पक्षाचे आमदार असलेले मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील ही सगळीच्या सगळी मंडळी जी सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरळत होती, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बेताल वक्तव्य करत होती, क्रांतीसूर्य जोतिबा फुलेंबद्दल वक्तव्य करत होती, त्याचीही आठवण सुषमा अंधारे यांनी करुन दिलीय.

त्या सगळ्यांवर हक्कभंग तर सोडाच, पण महापुरुषांचा अवमान होतोय म्हणून तरी किमान निंदाव्यंजक ठराव मांडणं आवश्यक होतं. पण त्यांनी तसा ठराव मांडला नाही. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस दुटप्पी भूमिका घेतात. देवेंद्र फडणवीस आपल्या आमदारांना वाचवतात. पण जाणीवपूर्वक हक्कभंगाचा प्रस्ताव आणतात, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Exit mobile version