Download App

जयंत पाटलांचा राजीनामा अन् पत्र दोन्हीही…; सुप्रिया सुळेंनी सांगितली पडद्यामागची महत्त्वाची घडामोड

  • Written By: Last Updated:

Supria Sule On Jayant Pati Statment : मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे असे म्हणत जयंत पाटलांनी (Jayant Patil) प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी पाटलांच्या राजीनामा आणि पत्रावर भाष्य करत पडद्यामागील गोष्ट सांगितली आहे.

लडेंगे और जितेंगे! राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी दिले नवे संकेत

जयंत पाटलांचा राजीनाम्यावर सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती 

जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या संकेतावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंत पाटील यांनी नाही पत्र दिलं आणि नाही राजीनामा दिलेला आहे. जयंत पाटील यांनी केवळ आपला वैयक्तिक विचार मांडला आहे. पक्षात यावर सविस्तर चर्चा होईल. प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसेल, तर नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही सुळे यांनी स्पष्ट केलं.

साहेबांनी एका मोठ्या हस्तीला दम दिला होता; जोरदार भाषण करत लंकेंनी बालगंधर्व रंगमंदीर गाजवलं

जयंत पाटील अतिशय महत्त्वाचे नेते

जयंत पाटलांचं भाषण झालं त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. दिल्लीवरून परत आल्यावर त्यावर चर्चा करेल असे म्हणत जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. एवढे वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढताय हे मला माहिती नाही. त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या असतील तर, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे त्यावर विचार केला जाईल.

“आता तीन महिने फक्त निवडणूक, 50 टक्के महिलांनाच निवडून द्या”, शरद पवारांनी क्लिअर सांगितलं

माझं आणि अजित पवारांचं पवित्र नातं जन्मापासून

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे किंवा कोणी कोणाबरोबर एकत्र जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला असल्याचेही सुळे यावेळी सांगितले. माझा आणि अजित पवारांचा प्रेमाचा पवित्र नातं हे जन्मापासून आहे. त्यामुळे त्यात अंतराचा विषय येत नाही आणि कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. यात काही वाद नसल्याचे सुप्रिया यांनी स्पष्ट केले. माझ्यावर आणि पवार कुटुंबीयांवर झालेले संस्कार आहेत. त्यात कधीच बदल होऊ शकत नाही. राजकीय लाईनी काही घ्यायची असेल तर दादाला आणि मला दोघांनाही हा काही बहीण भावांचा खेळ नाही. आणि भातुकलीचा खेळ नाही हे राजकारण आहे.अजित पवार आणि शरद पवार जो काही निर्णय होईल तो लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल.

 

follow us