Download App

इंग्लंडला पहिल्याच सामन्यात ६ विकेट्सने चारली धूळ; अंडर 19 टीम इंडियाचा मोठा विजय

मराठमोळ्या आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने वनडे सीरिजमध्ये विजयाने सुरुवात केली. भरारताने इंग्लंडवर

  • Written By: Last Updated:

ENG vs IND : अंडर 19 टीमने मोठ यश मिळवलं आहे. (IND) आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने काउंटी ग्राउंड होवेमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंडर 19 इंग्लंडचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. यासह भारतीय क्रिकेट संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.

वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे या सलामी जोडीने कडक सुरुवात केली आणि टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. वैभव-आयुषने 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वैभव आऊट झाला. वैभवने 19 बॉलमध्ये 252.63 च्या स्ट्राईक रेटने 48 रन्स केल्या. वैभवने या खेळीत 5 खणखणीत षटकार तर 3 चौकार लगावले. वैभवनंतर कर्णधार आयुषही झटपट आऊट झाला. आयुषने 30 चेंडूंमध्ये 4 फोरसह 21 धावा केल्या.

..तर सात दिवस खेळाडूला मैदानात NO ENTRY; क्रिकेटच्या नियमांत ICC कडून मोठा बदल

विहान मल्होत्रा आणि मौल्यराजसिंग चावडा या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 20 धावा जोडल्या. मौल्यराजसिंग याने 15 बॉलमध्ये 16 रन्स केल्या. विहान आणि अभिज्ञान कुंदु या जोडीने चौथ्या विकेटसाठी 24 धावांची भागीदारी केली. भारताने विहानच्या रुपात चौथी आणि अखेरची विकेट गमावली. विहानने 21 चेंडूत 18 धावा केल्या.

पुढे अभिज्ञान आणि राहुल कुमार या जोडीने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 55 धावा जोडल्या. अभिज्ञानने 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 45 धावा केल्या. तर राहुल कुमारने 25 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान दिलं. भारताच्या या विजयात वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंदु या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. तर इतरांनीही चांगली साथ विजयात योगदान दिलं.

Tags

follow us