Download App

छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमन हटाव मोहिमेत अनेक घरं, दुकानं जमीनदोस्त, लोकांचा मदतीसाठी आक्रोश

अतिक्रमित बांधकामांना नोटीस बजावण्यासाठी व रस्त्याचे आरेखन करण्यासाठी पन्नास अभियंत्यांचा चमू कामाला लावण्यात आला आहे.

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar  : छत्रपती संभाजीनगर शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी दिली. (Sambhajinagar) या मोहिमेसाठी पन्नास अभियंत्यांची फौज नोटीस वाटपाचे आणि मार्किंगचे काम करीत आहे, असंही ते म्हणाले. महापालिकेने मुकुंदवाडी ते चिकलठाणा दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला काही नागरिकांनी आव्हान दिले होते. मात्र, मोहिमेस स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. या पार्श्वभूमीवर प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जी. श्रीकांत म्हणाले, महावीर चौक ते केंब्रीज शाळा (जालना रोड), सिडको बसस्टँड ते हर्सूल टी पॉइंट, महानुभाव आश्रम ते बीड बायपास, महानुभाव आश्रम ते गेवराई तांडा (महापालिका हद्दीपर्यंत), छावणी ते दौलताबाद टी पॉइंट या पाच रस्त्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे. महावीर चौक ते सेव्हन हिल हा रस्ता ४५ मीटर रुंदीचा आहे. सेव्हन हिल ते केंब्रीज शाळेपर्यंतचा रस्ता साठ मीटर रुंदीचा आहे. यातील अन्य रस्ते देखील साठ मीटर रुंदीचे आहेत. या रस्त्यांवरील व सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे काढण्यात येतील. अतिक्रमित बांधकामांना नोटीस बजावण्यासाठी व रस्त्याचे आरेखन करण्यासाठी पन्नास अभियंत्यांचा चमू कामाला लावण्यात आला आहे.

अखेर बीडमधील त्या दोन शिक्षकांना अटक, विद्यार्थिनींचा केबिनमध्ये करत होते लैंगिक छळ

ज्या मालमत्ताधारकांकडे बांधकाम परवानगी आहे किंवा ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेची गुंठेवारी केली आहे, त्या मालमत्तेला हात लावला जाणार नाही. ज्या मालमत्ताधारकांकडं बांधकाम परवानगी नाही किंवा गुंठेवारी देखील केलेली नाही अशा मालमत्ता पाडण्यात येणार आहेत. अनधिकृत धार्मिक स्थळे देखील या मोहिमेच्या दरम्यान पाडण्यात येतील, असंही जी. श्रीकांत यावेळी म्हणाले आहेत.

महापुरुषांचे पुतळे रस्त्यात बाधित होत असतील तर ते स्थलांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी केली आहे. त्या जागेवर उद्यान विकसित करून त्या ठिकाणी पुतळे स्थलांतरित करण्यात येतील. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांवरील आणि सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविताना छोटी-मोठी किंवा बड्यांची बांधकामे असा भेदभाव केला जाणार नाही. रस्त्याची निर्धारित रुंदी राखण्याच्या आड जी बांधकामे येत असतील ती बांधकामे पाडण्यात येतील, असंही ते म्हणाले आहेत.

जालना रोडवर काही हॉटेल्ससह व्यापारी संकुल देखील आहेत, या अनुशंगाने त्यांना प्रश्न विचारला होता. त्यांनी बांधकाम परवानगी घेतली आहे त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. पण ज्यांनी बांधकाम परवानगी घेतलीच नाही त्यांची बांधकामे पाडण्यात येतील, असं श्रीकांत म्हणाले. रस्ते अतिक्रमणमुक्त केल्यावर रस्त्याच्या दोन्हीही बाजूने वीज खांब लावण्यात येणार आहेत. हे खांब रस्त्याच्या रुंदीची हद्द स्पष्ट करतील. लोकांना सहा मीटर जागा वगळून बांधकाम करावे लागेल.

follow us

संबंधित बातम्या