Download App

KBC 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात आलं पाणी; म्हणाले, ‘देवियो और सज्जनो…’

Amitabh Bachchan KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती 15’चा (Kaun Banega Crorepati 15) शेवटचा भाग 29डिसेंबर रोजी प्रसारित झाला होता. टीव्हीवरील सर्वाधिक पसंतीच्या क्विझ रिअॅलिटी शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) भावूक झाल्याचे बघायला मिळाले आहेत. या शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या (Bollywood) स्टार लेडीजची जादू पाहायला मिळाली. शर्मिला टागोर, सारा अली खान आणि विद्या बालन या शोमध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले आणि जेव्हा शो संपण्याची वेळ आली तेव्हा मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे डोळे भरून आले होते.


कौन बनेगा करोडपतीचा 15वा सीझन 18 एप्रिल 2023 रोजी धमाकेदारपणे सुरू झाला. अमिताभ यांनी हॉट सीटवर बसून अनेकांना प्रश्न विचारले आणि त्यांना लखपती ते करोडपती बनवले. ‘केबीसी’मध्ये ते प्रत्येक स्पर्धकासोबत विनोद करायचे आणि त्याच्या आयुष्यातील आणि करिअरमधील रंजक किस्सेही प्रेक्षकांसोबत शेअर करत असे, पण जेव्हा निरोपाचा विचार आला तेव्हा त्याला अश्रू आवरता आले नाहीत.

शोच्या शेवटच्या दिवशी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांनी बिग बींसोबत काही मनोरंजक गोष्टी शेअर केल्या होत्या. या कथांनंतर जेव्हा निरोपाची वेळ आली, तेव्हा बिग बी भावूक झाले आणि म्हणाले, ”देवियो और सज्जनो, आता मी जातोय आणि उद्यापासून हा मंच नसेल. हे आपल्या प्रिय माणसांना सांगणं खूप अवघड असतं आणि ही सांगायची आपली इच्छाही नसते. मी अमिताभ बच्चन या सिझनमध्ये या मंचावरुन शेवटचं बोलतोय शुभ रात्री!’ हे सांगताना अमिताभचा यांचे डोळे दाटून आले होते.

Dulhania 3: आलिया- वरूणच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात, फोटो शेअर करत दिली माहिती

अमिताभ बच्चन यांचे हे शब्द ऐकून तिथे बसलेल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आले. त्यातील एक जण म्हणाला की, ‘आजपर्यंत आपल्यापैकी कोणीही देव पाहिला नाही. पण आजपासून आपण देवाचा सर्वात लाडका पाहणार आहोत.’ सोनी टीव्हीनेही हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, तो पाहून अनेक लोक भावूक होत असल्याचे आहेत. तसेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयातून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून सर्वांनाच आपलंसं केलं आहे आणि अजूनही करत आहेत.

follow us