Download App

Tejasswi Prakash Birthday: इंजिनीअर होण्याचं स्वप्न बाळगलं अन् अभिनेत्री बनली! जाणून घ्या याबद्दल

Happy Birthday Tejasswi Prakash: छोट्या पडद्यावरचा आघाडीचा चेहरा म्हणजे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश. (Tejasswi Prakash Birthday) या अभिनेत्रीने अनेक सिरियलमधून आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या तेजस्वीने ‘बिग बॉस’चे (Big Boss) विजेतेपद पटकावत जोरदार कल्ला केला होता. (Tejasswi Prakash) सध्या ‘नागिन ६’ आणि करण कुंद्रा सोबतच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत असलेली तेजस्वी प्रकाश आज (१० जून) आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहे.


सध्या मनोरंजन विश्व गाजवत असल्याने तरीदेखील तेजस्वीला कधी अभिनेत्री बनायचे नव्हते. इंजिनिअर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षण घेणारी तेजस्वी आता मनोरंजन विश्वात आली आहे. तेजस्वी प्रकाश हिचा जन्म १० जून १९९३ रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झाला आहे. मराठमोळ्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या तेजस्वीचे कुटुंब संगीताशी जोडले होते. तेजस्वीचे वडील प्रकाश वायंगणकर हे स्वतः संगीतकार आहेत.

तेजस्वी देखील अभिनयासाठी नाही, तर गाण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. तेजस्वी एक भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. तेजस्वीने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. पण, अभिनेत्री बनण्यासाठी तिने अभियांत्रिकी सोडून अभिनयाच्या दुनियेमध्ये प्रवेश केला आहे. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी तेजस्वीने तिच्या करिअरला सुरुवात केली. २०१२मध्ये ती टीव्ही शो ‘२६१२’मध्ये दिसली होती. पण, ‘संस्कार-धरोहर अपनो की’ या सिरीयलमधून तिला खरी ओळख मिळाली आहे.

Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…

तेजस्वी ‘स्वरागिनी-जोड़े रिश्तों के सूर’, ‘पहरेदार पिया की’ आणि ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ सारख्या टीव्ही शोमध्ये देखील दिसून आली आहे. तेजस्वी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या लव्ह लाईफमुळे सध्या खूपच चर्चेत आली आहे. करणअगोदर तेजस्वीचे नाव टीव्ही अभिनेता शिवीन नारंगबरोबर जोडले गेले होते. दोघे ‘खतरों के खिलाडी १०’ या रिअॅलिटी शोमध्ये एकत्र दिसून आले होते. या शोमध्ये दोघांची बाँडिंग चाहत्यांना खूप आवडली होती.

मात्र आता ती करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची जोरदार आहे. तेजस्वी टीव्हीवर खूप वर्षांपासून काम करत असली, तरी ‘बिग बॉस १५’पासून तिची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिने केवळ हा शो जिंकला नाही, तर ती करोडो चाहत्यांच्या हृदयाची धडकन बनली आहे. या शोमध्ये तिची करणशी भेट झाली आहे. ‘बिग बॉस १५’ हा शो जिंकल्यावर अभिनेत्रीने एकता कपूरच्या ‘नागिन ६’मध्ये एन्ट्री घेत चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले आहे.

Tags

follow us