Download App

Kamal khan ला मुंबई पोलिसांकडून बेड्या; ट्विट करत म्हणाला मी मेलो तर…

  • Written By: Last Updated:

Kamal khan : अभिनेता कमाल खान (Kamal khan) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याबद्दल स्वतः कमालने आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडल वरून पोस्ट करत माहिती दिली. या पोस्टमध्ये त्याने धक्कादायक दावा केला आहे.

Madhya Pradesh Cabinet : मोदी-शाहांचा पुन्हा धक्का! चौहान-सिंधियांचे खास नेते मंत्रिमंडळातून बाहेर…

या पोस्टमध्ये कमाल खान म्हणाला की, मी गेले एक वर्षापासून मुंबईमध्ये आहे. तसेच मी माझ्यावर दाखल असलेल्या केसच्या सर्व तारखांना नियमित हजर राहत आहे. मात्र मी दुबईला जात असताना मुंबई पोलिसांनी एअरपोर्टवर मला अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मी वॉन्टेड आहे.

कमाल खानची एक्सवरील पोस्ट…

तसेच त्याने पुढे लिहिले की, सलमान खान याने टायगर थ्री फ्लॉप होण्याचे आरोप माझ्यावर लावले. त्यामुळेच मला अटक करण्यात आली आहे. तसेच जेलमध्ये जर मी मेलो तर तुम्हा सगळ्यांना माहीत असायला हवं की, ही एक हत्या आहे. असं म्हणत कमालने हा धक्कादायक दावा केला आहे.

Shirur Loksabha : शिरुरची जागा अजितदादांकडे गेल्यास आढळराव काय करणार?

दरम्यान कमाल खानला 2016 मधील एका केस संदर्भात अटक करण्यात आली आहे. गेल्यावेळी 2022 मध्ये देखील त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी देखील त्याच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्याचबरोबर त्याने दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी देखील त्याला अटक करण्यात आली होती.

कमाल आर खान देखील सोशल मिडीयावर कायमच चर्चेत असतो. तो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हिंदी चित्रपटांबाबत भाष्य करत असतो. त्याच्या या ट्विटमुळे तो वादामध्ये देखील सापडत असतो. असंच एक धक्कादायक आरोप करणारं ट्विट कमाल आर खानने केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने अक्षय कुमारने आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे. असा दावा केला होता.

Tags

follow us