Download App

रणबीर-आलियाबाबत कंगनाचे धक्कादायक आरोप; लग्न केवळ प्रोमोशनसाठी ते वेगळे…

Kangna Ranaut on Ranbir-Alia : कंगना रनौत ( Kangna Ranaut) च्या निशाण्यावर नेहमीच कोणते कोणते बॉलिवू़ड सेलिब्रेटी असतात. त्यात आता तिने थेट रणबीर आलियाच्या लग्नावर धक्कादायक आरोप केले आहेत. मात्र तिने या कपलचं नाव न घेता हा निशाणा साधला आहे. तिने अभिनेत्याने आताच एक फॉरेन टूर केली. मात्र आपल्या पत्नी आणि मुलीला सोबत नेले नाही असा आरोप केल्याने हे स्पष्ट झालं की तिने रणबीर आलियावर टीका केली. कारण नुकतंच रणबीर कपूर आणि आई नीतू कपूर त्यांच्या कुटुंबासोबत लंडनला गेले होते. ही टीका करताना कंगनाने इन्स्टाग्रामवर भली मोठी पोस्ट लिहीली आहे. (Kangana Ranaut Allegations on Ranbir Kapoor and Alias marriage )

101a42b2d9969d232c2d484e9251f43b1689676727823254_original

101a42b2d9969d232c2d484e9251f43b1689676727823254_original

काय म्हणाली कंगना?
कंगना म्हणाली की, आणखी एक बातमी ही खोट्या पती-पत्नीची जोडी वेगवेगळे राहतात. मात्र कपल असण्याचा देखावा करतात. चित्रपटांच्या खोट्या घोषणा केल्या जात आहेत. एका ब्रॅंडला स्वतः असल्याचं सांगत आहेत. अभिनेत्याने आताच एक फॉरेन टूर केली. मात्र आपल्या पत्नी आणि मुलीला सोबत नेले नाही. असा आरोप करत कंगनाना रणबीर आलियाच्या लग्नावर खोटं असल्याचा आरोप केला आहे.

पीडीत महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढं यावं; सोमय्या प्रकरणी नीलम गोऱ्हेंचे आवाहन

पुढे कंगना म्हणाली की, त्यांनी फक्त पैशांसाठी लग्न केले आहे. वडिलांच्या दबावाला बळी पडून त्यांनी हे लग्न केले आहे. यामुळे या अभिनेत्याला चित्रपट मिळाला. पण आता ते दोघ या लग्नातून मुक्त होऊ इच्छीत आहेत. पण त्यांनी आपल्या पत्नी आणि मुली कडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील कंगनाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या अपात्रतेची मागणी; फडणवीसांनी संपूर्ण नियमावलीच सांगितली

कंगनाच्या पोस्टवर नेटकरी प्रचंड कमेंट्स करत आहेत. मात्र त्यावर अद्याप रणबीर आणि आलियाने कमेंट्स केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यावर आता ते दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us