Download App

Kartik Aaryan: कार्तिक आर्यन कधी चढणार बोहल्यावर? कोण आहे त्याची होणारी बायको…

Kartik Aaryan Marriage: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) लग्नसराईचा जोरदार सीझन सुरू होणार आहे. यातच बॉलिवूडचा मोस्ट हँडसम बॅचलर अर्थात अभिनेता कार्तिक आर्यन लग्न कधी करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच करण जोहर (Karan Johar) आणि कार्तिक आर्यन यांनी एका इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यावर सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खिळल्या असल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काहीच दिवसांपूर्वी करण आणि कार्तिक यांच्यात चांगलाच वाद झाल्याची चर्चा समोर येत होती. करण जोहरच्या ‘दोस्ताना-२’मधून कार्तिकने काढता पाय घेतला होता. परंतु या सिनेमाला नकार दिल्याने दोघांमध्ये चांगलेच वाद पेटल्याचे बघायला मिळत होते.


परंतु आता त्यांच्यातील हा वाद मिटला आहे. या इव्हेंटमध्ये दोघांनी एकत्र हजेरी लावली आहे. आणि कार्तिकच्या लग्नाचा मोठा खुलासा देखील केला आहे. सध्या करण आणि कार्तिक दोघेही मेलबर्नमध्ये आहेत. या ठिकाणी ते एका सिनेमा महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. या कार्यक्रमाला करण जोहरने देखील हजेरी लावली होती. करण जोहरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. यामध्ये तो कार्तिक आर्यनच्या लग्नाबद्दल बोलत असताना दिसून आला आहे.

इन्स्टंट बॉलिवूडने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये आयोजित पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत कार्तिक आणि करण दोघेही एकत्र पाहायला मिळाले आहेत. कार्तिक आर्यनबद्दल बोलत असताना करणने सांगितले आहे की, ‘आघाडीचा सुपरस्टार कार्तिक आर्यनबद्दल काय सांगू… मला खात्री आहे की, तो २०२३च्या शेवटीला लग्न करणार आणि ते धमाकेदार राहणार आहे. मेलबर्नमध्येच एका चाहतीने कार्तिक आर्यनला लग्नासाठी प्रपोज देखील केले आहे. इतकेच नाही तर, यावेळी चाहतीने कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाचे कौतुक केले आणि या सिनेमाने सर्वांनाच भावूक केल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

Payal Waje: शिवली परबचं नवीन रोमँटिक गाणं ‘पायल वाजे…’ आलंय प्रेक्षकांच्या भेटीला!

करण जोहर याने त्याच्या ‘दोस्ताना २’ या सिनेमासाठी कार्तिक आर्यनला साईन केले होते. ज्यामध्ये त्याच्या सोबत अभिनेत्री जान्हवी कपूर हटक्या अंदाजात दिसणार होती. कार्तिकने या सिनेमासाठी मोठी रक्कम मागितली होती आणि या स्क्रिप्टमध्ये देखील काही बदल करण्यात आल्याचे त्याने यावेळी सांगितले होते. जे करण जोहरला आवडले नसल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकच्या बॅकआउटमुळे करणच्या सिनेमाला तब्बल २० कोटींचे नुकसान झाल्याचे त्याने यावेळी सांगितले होते. परंतु दोघांनी आता वाद मिटवले असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज