Download App

Naseeruddin Shah : तर लाल किल्ला, ताजमहाल, कुतूब मिनार पाडून टाका !

  • Written By: Last Updated:

“मोगलांनी चुकीचं केलं असेल तर लाल किल्ला, ताजमहाल कुतूब मिनार पाडून टाका” असं वक्तव्य ताज या आगामी वेबसिरीजमध्ये मुघल सम्राट अकबरची भूमिका साकारणारे नसरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान केले आहे. ते म्हणाले की मध्ययुगीन इतिहासातली राज्यकर्ते कोणत्याही कारणास्तव खलनायक बनवतात.

यावेळी बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले की, “तीन शतकांपर्यंत मुघलांनी उत्तर भारताच्या मोठ्या भागावर राज्य केले. त्यांच्या सत्तेचा उत्कर्ष १७ व्या शतकात होता. पण गेल्या काही वर्षांत देशात अशी भूमिका तयार केली जात आहे की मोगल इतर आक्रमणकर्त्यांप्रमाणे क्रूर होते आणि त्यांनी आपली संस्कृती खराब केली. आजकाल बरेच लोक भारतात त्यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

हेही वाचा : Adani Share Price : अदानीसोबत आता LIC चा पैसाही बुडू लागला, वाचा किती कोटींचा फटका बसला?

ते म्हणाले की जे लोक अकबर आणि नादिर शाह किंवा बाबरचे वंशज तैमूर यांच्यातील फरक सांगू शकत नाहीत. हे लोक येथे लुटण्यासाठी आले होते, मोगल येथे लुटण्यासाठी आले नव्हते. ते येथे त्यांचे घर बनवण्यासाठी येथे आले आणि त्यांनी तेच केले. त्यांचे योगदान कोण नाकारू शकेल? ‘

Tags

follow us