Download App

Ranbir अन् आलियाच्या नात्यात ‘का रे दुरावा? नीतू कपूरच्या ‘त्या’ पोस्टने मिळाला पुरावा

Neetu Kapoor Viral Post: बॉलिवूडमधील (Bollywood) कपूर फॅमिली ही इंडस्ट्रीतील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक आहे. या घराण्याच्या काही पिढ्यांनी मोठ्या पडद्यावर आपली अभिनयाची जादू कायम ठेवली आहे. या घराण्यातील सुनांनी देखील बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये उत्तम प्रकारे काम केले आहे, आणि एक उत्तम अभिनेत्री बनल्या आहेत. तसेच गेल्या काही वर्षे पडद्यापासून दूर असलेल्या नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी एन्ट्री केली होती.


गेल्या वर्षी अभिनेता रणबीर कपूरचे (Ranbir kapoor) देखील लग्न पार पडले. परंतु सध्या कपूर कुटुंबामध्ये काही वाद निर्माण झाले आहेत का? असा सवाल सध्या चाहते करत असल्याचे दिसून येत आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमुळे चाहते चांगलच गोंधळात पडल्याचे दिसून येत आहे. त्यांची ही पोस्ट बघितल्यानंतर लोक नीतू कपूर यांचे कुटुंबात वाद आहे की, काय असा अंदाज लावू लागले आहेत. अभिनेत्री नीतू कपूर यांनी आपल्या इन्स्टास्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, ‘आमचे कुटुंबे आता अगोदरसारखे आजिबात राहिले नाही. याचे कारण म्हणजे ज्यांच्यामुळे हे कुटुंब एकत्र येत असायचे, आता तेच या जगामध्ये नाहीत.’ अशी पोस्ट तिने यावेळी केली होती.

नीतू कपूर यांच्या या पोस्टवर यूजर्स सोशल मीडियावर अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावत असल्याचे दिसून येत आहेत. यादरम्यान नीतू कपूर यांनी एक फॅमिली फोटो शेअर केला होता. परंतु यामधून आलिया भट्ट नसल्याचे दिसून येत आहे. नीतू आणि आलिया यांच्यामध्ये दुरावा आल्याचा अंदाज  चाहते लावत असल्याचे दिसत आहेत. नीतू कपूर यांनी नुकताच त्यांचा ६५वा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला आहे. त्या दरम्यान रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर साहनी, तिचा पती भरत साहनी आणि मुलगी समायरा यांनी उपस्थिती दर्शवली होती.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

यावेळी आलिया आणि राहा मात्र दिसून आले नाहीत. यामुळे आता त्यांनी शेअर केलेली ही नोट नक्की कुणासाठी आहे, याचा अंदाज लावत असल्याचे प्रयत्न करत आहेत. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून आलिया आणि रणबीर यांच्या नात्याबद्दल चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. त्यामध्ये अभिनेत्री कंगना रनौतने देखील यामध्ये उडी मारली होती. कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यामध्ये तिने सांगितले होते की, ‘असे होते, जेव्हा तुम्ही एखाद्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लग्न करता.

या अभिनेत्याने सिनेमा माफियाच्या दबावाखाली लग्न केल्याचे भाष्य तिने यावेळी केले आहे. तसेच बदल्यात सिनेमा मिळावा म्हणून त्याने पापा की परीशी लग्न केल्याचे दिसून आले आहे. आता त्याला या खोट्या लग्नापासून मुक्ती मिळवायची असल्याचे देखील तिने स्पष्ट केले आहे. परंतु आता त्याला त्याची बायको आणि मुलीची काळजी घ्यावी लागणार आहे. हा भारत आहे, इथे एकदा लग्न झाले की सर्व गोष्टी संपत असतात.

Tags

follow us