Download App

SS Rajamouli: राजामौलींच्या वडिलांनी दिली RRR 2 बद्दल मोठी अपडेट; म्हणाले… 

SS Rajamouli: एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘RRR’ या सिनेमाने फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. २०२२ या वर्षाती हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. यातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानेही (Natu Natu song) ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला आहे. यानंतर आता या सिनेमाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. राजामौली यांचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक विजयेंद्र प्रसाद (Vijayendra Prasad) यांनी RRR च्या सीक्वेलविषयी घोषणा केली आहे.


या सीक्वेलच्या कथेवर सध्या जोरदार काम सुरू असल्याचे यावेळी सांगितले जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले आहे की, RRR चा सीक्वेल हा हॉलिवूड प्रोजेक्ट असणार आहे. हॉलिवूड (Hollywood) दिग्दर्शक या सीक्वेलचं दिग्दर्शन करत आहेत. विजयेंद्र यांनी हेदेखील यावेळी जाहीर केले आहे की, रामचरण आणि ज्युनियर एनटीआरच या सीक्वेलमध्ये मुख्य भूमिका असणार आहे. परंतु RRR ची तीच कथा सीक्वेलमध्ये पुढे जाणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तेलुगू राज्यांत दुसऱ्या प्रकरणाच्या आधारावर त्याची कथा राहण्याची शक्यता आहे.

“रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या RRR सिनेमाच्या सीक्वेलवर आम्ही काम करत आहोत. या सिनेमाचं  दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु या सिनेमावर त्यांचं खूप बारकाईने नजर असणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सिनेमा बनवला जाणार आहे, असं विजयेंद्र प्रसाद यावेळी सांगितले आहे.  या अगोदर देखील राजामौलींनी सीक्वेलबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. शिकागोमध्ये पार पडलेल्या RRR च्या स्क्रीनिंगच्या दरम्यान राजामौलींना सीक्वेलविषयी काही सवाल विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले होते की, “मी सीक्वेलबद्दल सध्या फार काही सांगू शकणार नाही.

Lets Get Married Trailer: कॉमेडी, ड्रामा अन् सस्पेंस, माहीच्या ‘लेट्स गेट मॅरिड’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

परंतु एवढं नक्कीच सांगू शकतो की माझे वडील, ज्यांनी RRR सह आतापर्यंत माझ्या प्रत्येक सिनेमाची पटकथा लिहिली आहे, त्यांच्याबरोबर मी यावर चर्चा केली आहे. ते सध्या या कथेवर काम करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदरच १९२० चा काळ RRR या सिनेमात दाखवण्यात आला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम या दोन क्रांतिकारकांविषयी ही कथा आहे. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली, तरी देखील सिनेमाची संपूर्ण कथा ही काल्पनिक असल्याचे यावेळी सांगितले आहे.

RRR या सिनेमात ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिकेत दिसून आले होते. तर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. राजामौली यांचे वडील आणि पटकथा लेखक विजयेंद्र प्रसाद हे सीक्वेलची कथा लिहित असलयाचे यावेळी सांगण्यात आले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज