Devendra Fadnavis : विठूमाऊलीच्या चरणी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीचा संकल्प!
विठूमाऊलीच्या चरणी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीचा संकल्प!
shakir sayyad
Devendra Fadnavis
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।।
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. महाराष्ट्रावर विठूमाऊलीची कृपादृष्टी सदैव राहो, राज्यात सुख-समृद्धी नांदो, शेतकरी सुखी-समृद्ध होवोत आणि जनतेच्या जीवनात आनंद व समाधान लाभो, अशी प्रार्थना त्यांनी विठूमाऊलीच्या चरणी केली.
त्याचबरोबर पंतप्रधाान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तरुणाईसाठी सुरू केलेल्या विकास आणि नव्या संधींच्या प्रवासाला अधिक बळ मिळावे, प्रत्येक युवक-युवतीच्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प अधिक वेगाने साकार व्हावा, यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपूर येथे मानाचे वारकरी दाम्पत्य बाळासाहेब माने व श्रीमती प्रभावती माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आले.
4
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदा वारीने नवा उच्चांक गाठला असून 25 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत भाविकांची रांग लागली आहे. मात्र, या सर्व भाविकांची अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. श्री विठ्ठल नामाचा गजर करत भाविक दर्शन घेत आहेत. जगाच्या पाठीवर असा आनंदाचा सोहळा दुसरा नाही, जिथे कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघतात.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपूर येथे भगवान श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. भाविकांची सातत्याने वाढणारी संख्या लक्षात घेता अधिक प्रशस्त परिसर आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने यावर्षीच पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था अधिक सुलभ, सुव्यवस्थित आणि सुरळीत होईल.
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा मानत राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.