गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळाने मोठे नुकसान केले आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील गारपिट व वादळाने नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी केली.
गारपीट व वादळामुळे नुकसान झालेल्या कांदा,पपई,डाळिंब यासह इतर पिके-फळबागांची पाहणी केली.
तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते.
सर्व फोटो – महाराष्ट्र शासन