Download App

इस्त्रायल इराण युद्ध अन् भारताचं 47 हजार कोटींचं नुकसान, वाचा प्रकरण काय?

Israel Iran war मुळे भारताचे तब्बल 47 हजार कोटी रूपयांचं नुकसान होऊ शकतं. हे प्रकरणं नेमकं काय? जाणून घेऊ सविस्तर...

Israel Iran war and India’s loss of 47 thousand crores : इस्त्रायल आणि इराण ((Israel Iran War) ) यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. ज्यामुळे जगभरामध्ये त्याचे विविध परिणाम दिसून येऊ लागले आहेत. इस्त्रायल इराण युद्धाचा परिणाम भारतावर दिसू लागला आहे. कारण मध्य पुर्वेमध्ये सुरू असलेल्या या संघर्षामुळे भारताचे तब्बल 47 हजार कोटी रूपयांचं नुकसान होऊ शकतं. हे प्रकरणं नेमकं काय? जाणून घेऊ सविस्तर…

आता दुचाकीवरून घसरून पडणं विसरा; दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम, नेमकं काय होणार?

भारत चाबहार पोर्टबाबत अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी भारताने इराणशी (Israel Iran War) मे 2024 मध्ये शाहिद बेहेश्ती टर्मिनलचं संचलन करण्यासाठी 10 वर्षांचा एक मोठा करार केला आहे. हा पोर्ट भारताला अफगानिस्तान आणि मध्य अशिया पर्यंतचा एक सरळ जमीनीवरील रस्ता निर्माण करतो. ज्यातून पाकिस्तानला बायपास केलं जाऊ शकतं. तसेच चीनच्या ग्वादर पोर्टचं महत्त्व कमी करण्याचं काम देखील यामुळे होऊ शकतं.

मनसेसोबत युती, स्थानिक पातळीवर आढावा द्या, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

मात्र सध्या इस्त्रायल इराण युद्ध (Israel Iran War) आणि पाश्चिमात्या देशांचे निर्बंध या योजनेसाठी आव्हान ठरत आहेत. तरी देखील यासाठी भारत आणि इराण कायम संपर्कात आहेत. जेणे करून चाबहार पोर्ट आणि INSTC कॉरिडोरच्या कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये. तसेच इस्त्रायल इराण युद्धामुळे वीमा आणि लॉजिस्टिक्स सेवांवर परिणाम होऊ शकतो. तसेच पोर्ट विकास आणि रेल्वे कनेक्टीव्हीटी मंद होऊ शकते. आणि आयएनएसटीसीच्या पुरवठ्यामध्ये अडथळे येऊ शकतात. इस्त्रायल इराण युद्ध आणखी भडकल्यास भारताला तब्बल 47 हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं.

चाबहार पोर्ट का महत्त्वाचं आहे?

चाबहार पोर्ट (Israel Iran War) भारतासाठी भू सामरिक आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. हे बंदर भारताला अशा देशांशी जोडणारं ठरेल. जेथे जाण्यासाठी पाकिस्तानचा मार्ग वापरावा लागत होता. चाबहार पोर्ट अफगानिस्तानसाठी समुद्रापर्यंत पोहचण्याचा एकमात्र पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे त्यांचं पाकिस्तानवरील अवलंबित्व कमी होईल. कारण भारताने याच मार्गाने अफगाणला अन्न धान्यांची मदत पाठवली आहे.

मला नाही तर, कुणालाच नाही; शिरसाटांमुळे संभाजीनगरमधील VITS लिलाव रद्द

भारताची सरकारी कंपनी इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (IPGL) याला संचालित करत आहे. तसेच यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि कांडला पोर्ट ट्रस्ट देखील सहभागी आहेत.या अगोदर हे काम इरकॉन इंटरनॅशनल कंपनीला देण्यात आलं होतं मात्र फंडिगमुळे ही कंपनीला काढून टाकण्यात आले. या योजनेसाठी आतापर्यंत भाताने 8.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय एक्ज़िम बॅंकेकडून 15 कोटी डॉलर्सचं कर्ज घेण्यात आलं आहे. तसेच 40 कोटी डॉलर्सचं अतिरिक्त कर्ज घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे चाबहार-जाहेदान रेल्वेसाठी भारताने आतापर्यंत 55 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

जिल्ह्यातील ‘अॅक्सिडेंट स्पॉट’ शोधणार, ‘त्या’ वाहनांवर कारवाई होणार, प्रशासनाचा आदेश काय?

दरम्यान या प्रकल्पामध्ये खाजगी कंपन्या देखील रूची दाखवत आहेत. त्यामध्ये अडानी ग्रुप आणि एस्सार यांनी रूची दाखवली असली तरी देखील अद्याप कोणतीही मोठी खाजगी गुंतवणूक झालेली नाही. सरकारकडून सतत यासाठी आवाहन करत आहे.

follow us